अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोना काळात रद्द केलेल्या रेल्वे गाड्यांना थांबा पुन्हा मिळावा या मागणीसाठी आज नांदगावमध्ये गांधीपुतळ्या जवळ नागरीकांनी उपपोषण सुरु केल आहे. कोरोना काळात नांदगाव रेल्वे स्थानकावर अनेक रेल्वे प्रवाशी गाड्यांना थांबा असल्याने नांदगाव येथून भुसावळ व नाशिक-मुंबईला जाणा-या प्रवाशांना त्याचा फायदा होत होता. मात्र कोरोना काळात अनेक गाड्या रद्द झाल्या त्यानंतर काही गाड्या सुरु झाल्या. मात्र नांदगाव रेल्वे स्थनकाचा थांबा रद्द झाला. सध्या केवळ दोनच गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी प्रमाणेच ज्या गाड्यांना थांबा होता तो पुन्हा देण्यात यावा साठी हे उपोषण करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने त्वरीत थांबे पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.