मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जूनला होणारा अयोध्या दौरा पुढे ढकलला आहे. 22 मे रोजी पुण्यात होणाऱ्या मेळाव्यात याबाबत अधिक तपशील सांगणार असल्याचे राज यांनी सांगितले आहे. राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्येला जाणार होते.
उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी अयोध्येत येण्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांनी उत्तर भारतीयांना “अपमानित” केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली होती. जोपर्यंत राज ठाकरे जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत उत्तर प्रदेशात जाऊ देणार नाही, असे भाजप खासदाराने म्हटले होते. मात्र, राज ठाकरे यांनी अयोध्या यात्रा पुढे ढकलण्यामागील कारणांची माहिती दिलेली नाही. राज ठाकरेंच्या दौऱ्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा १५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते.
राज ठाकरे हे 22 मे रोजी पुण्यात रॅली घेणार आहेत आणि तेथे ते त्यांच्या अयोध्या दौऱ्याशी संबंधित माहिती देणार आहेत. याआधी एप्रिलमध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा ‘अल्टीमेटम’ दिला होता, त्यानंतर त्यांना धमकीचे पत्र आले होते.
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय-ए) प्रमुख रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना पुढील महिन्यात उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट देण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी, असे सांगितले आहे.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022