India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मराठा आरक्षणावरुन मंत्री तानाजी सावंत यांचे वादग्रस्त विधान; बघा काय म्हणाले ते

India Darpan by India Darpan
September 26, 2022
in मुख्य बातमी
0

 मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “सत्तांतर झाले की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. उस्मानाबादमध्ये हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांची जीभ घसरली. त्यांच्या या वक्तव्यावर टिका केली जात आहे.

मराठा आरक्षणावरुन अनेक नेत सातत्याने चर्चा करत असतात, आपले मत व्यक्त करत असतात. सत्तेत आल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची पावले उचलली. यानंतर आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. अशातच या सरकारमधील मंत्री असलेले तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरुन विरोधकांवर निशाणा साधताना एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसीमधून पाहिजे. उद्या म्हणतील एससीमधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे”, असेही ते म्हणाले.

तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करताना विरोधकांना ज्या भाषेत सुनावले त्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या काळात दोन वेळा मराठा आरक्षण गेला, असा आरोपही तानाजी सावंत यांनी केला आहे. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचेही सावंत म्हणाले होते.

याबरोबरच, बीडमध्येही तानाजी सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. “माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका. मुख्यमंत्र्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही”, अशी टीका आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली होती.

Minister Tanaji Sawant Controversial Statement on Maratha Reservation


Previous Post

उत्कर्ष वानखेडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा राजगायक; मिळाली एवढी बक्षिसे

Next Post

शिंदे गटाबाबत भाजप हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिल्या या सूचना

Next Post

शिंदे गटाबाबत भाजप हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिल्या या सूचना

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group