मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी काठच्या नागरीकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे तातडीने काही नागरीकांना बाजूच्या गुरुव्दारात हलविण्यात आले होते. आमदार सुहास कांदे यांनी आज सपत्नीक पुरस्थितीची पाहणी करीत पुरग्रस्त नागरीकांच्या भेटी घेत त्यांना दिलासा दिला. यावेळी त्यांनी पुलाची उंची वाढविण्याचा आणि नदीकाठी संरक्षक भिंतीची काम लवकरच करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या. नुकसानग्रस्तांना संसारपयोगी वस्तू आणि धान्य त्वरीत वाटप करण्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.