बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालेगाव तालुक्यातील १२५ गावांमध्ये राबविले जाणार हे अभियान

by India Darpan
मार्च 11, 2022 | 8:38 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220311 WA0164

नाशिक – राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत एकुण ५ हजार १४२ गावांची निवड करण्यात आली असून, जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली, ही अतिशय आनंदाची बाब आहे. या अभियानातून आपल्या राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांच्या माध्यमातून सक्षम व उत्पादनक्षम बनविण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

आज नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेच्या तोंडओळख होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्रालयातील दालनातून दुरदृश्यप्रणालीद्वारे कृषीमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी गंगाथरन डी., विभागीय कृषी सह संचालक संजय पडवळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी जितेंद्र शाह, मालेगावचे उपविभगीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे कृषी विद्याव्यत्ता विजय कोळेकर तसेच मालेगाव तालुक्यातील १४१ गावातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच सदस्यही या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होते.

यावेळी बोलतांना कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, आपला देश हा कृषीप्रधान देश असून, कृषीक्षेत्रात आपल्या राज्याचा मोठा वाटा आहे. ही बाब लक्षात घेवून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करण्यासाठी व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस हवामान बदलत असून, अकाळी पाऊस, ओला व कोरडा दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीसारख्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. यासाठी त्या गावाचा सर्वांगिण विकास करतांना पावसाचे प्रमाण, उपलब्ध पाणी, तेथील वातावरण आणि गरज लक्षात घेवून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यावेळी कृषी मंत्री म्हणाले की, शेतकरी बांधवांना वातवरणातील बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी व शेती व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविणे आवश्यक आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन व तंत्रज्ञानावर आधारीत सुक्ष्म नियोजन तसेच वेळोवेळी गावपातळीवर शेतकऱ्यांना शेतीच्या विविध योजना लाभ मिळावा यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामसभेचही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा जपून वापर व्हावा यासाठी गावातील छोटे व मोठे बंधारे यांच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

गाव केंद्र घटक मानून कृषि व्यवसाय आणि शेतकऱ्यांची क्षमता बांधणीकरीता लोकसहभागातून नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा ताळेबंद, शेतीसाठी पाणी, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, पिकांसाठी नवीन तंत्रज्ञान, कृषि व्यवसाय आणि शेतकऱ्यांची क्षमता बांधणी या बाबींवर भर देण्यात येणार आहे. शेतीक्षेत्रात महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी लक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक प्रकल्प गावात कृषिताईचे सातबाऱ्यावर नामनिर्देशन करण्याकरीता कोणतेही पैसे न घेता अर्ज केल्यापासून १५ दिवसाच्या आत उताऱ्यावर नाव लावण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प समितीमध्ये ग्रामपंचायत कायद्यानुसार सर्व घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्याबरोबरच महिला ५० टक्के प्रतिनिधित्व करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले आहे.

गावांचे लघुपाणलोट आधारीत सुक्ष्म नियोजन करण्यासाठी गावातील शेतकरी व इतर सामाजिक घटकांमध्ये जागृती निर्माण करणे, हवामान बदलांमुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने तपशील तयार करणे, पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे जलसंधारण कामांचा आणि पीक रचनेचा/बदलाचा आराखडा तयार करणे, उत्पादित शेतमालाच्या विक्री व प्रक्रिया व्यवस्थांचा अभ्यास करून मुल्यसाखळी बळकटीकरण करण्यासाठी उपाय प्रस्तावित करणे यासाठी एप्रिल महिन्यात मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात यावी, अशा सुचनाही यावेळी संबंधित अधिकारी यांना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या आहेत.

या प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये वैयक्तिक लाभासाठीच्या योजनांकरीता २ हेक्टर पर्यंत जमीन धारकांना ७५ टक्के आणि २.५ हेक्टर जमीनधारकांना ६५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. महिलांना पिकांवरील किडी रोगाची ओळख व नियंत्रण करण्यासाठी शेतीशाळा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना शेती व्यवसायाबरोबर पुरक व्यवसाय करण्यासाठी, जैविक व सेंद्रीय खतांची निर्मिती करण्यासाठी अणि फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यासाठी प्रोत्सान व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. याबरोबरच योजनांची माहिती व लाभ घेण्याकरीता विविध ॲपही तयार करण्यात आले आहे, अशी माहिती ही यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरात या दोन दिवशी या भागात पाणीपुरवठा नाही

Next Post

नाशिक – डॉ.शेफाली भुजबळ यांचे चार दिवशीय ‘निसर्गायण’ चित्र प्रदर्शन; मान्यवरांच्या उपस्थितीत झाले उदघाटन

India Darpan

Next Post
IMG 20220311 WA0186 e1647011635888

नाशिक - डॉ.शेफाली भुजबळ यांचे चार दिवशीय 'निसर्गायण' चित्र प्रदर्शन; मान्यवरांच्या उपस्थितीत झाले उदघाटन

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011