गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार कलगीतुरा रंगणार

by India Darpan
डिसेंबर 2, 2021 | 10:59 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
फाईल फोटो

फाईल फोटो


मुंबई – केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार यांच्यात आता चांगलाच कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी भाजप विरोधात एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आहे. गेल्या दोन वर्षात राज्य आणि केंद्र सरकारमध्ये अनेकदा वाद झाला आहे. मात्र, आता सलग दोन घटनांमुळे हा कलगीतुरा चांगलाच वाढण्याची चिन्हे आहेत.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची विनंती महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला केली होती. मात्र, ती मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे कुंटे हे सेवानिवृत्त झाले आहेत. तर, देबाशिष चक्रवर्ती यांची महाविकास आघाडी सरकारला नाईलाजाने मुख्य सचिवपदी नियुक्ती करावी लागली आहे. चक्रवर्ती हे येत्या फेब्रुवारी महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे अवघे तीन महिनेच ते कारभार पाहणार आहेत. हा प्रस्ताव नाकारुन केंद्राने महाविकास आघाडी सरकारची कोंडी करत नाही तोच आणखी एक प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारने विमानतळांसाठी नवी नियमावली जाहीर केली असताना त्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे.

ओमिक्रॉनचा संभाव्य धोका पाहता महाराष्ट्र सरकारने निश्चित केलेल्या कोरोना नियमांवर केंद्र सरकारने आक्षेप घेतला आहे. हवाई प्रवासाबद्दल महाराष्ट्र सरकारने तयार केलेले नियम केंद्राने निश्चित केलेल्या नियमांपेक्षा भिन्न आहेत. हे योग्य नाही. केंद्राच्या दिशानिर्देशांप्रमाणेच राज्याचे नियम असायला हवे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या अतिरिक्त सचिवांना पत्र लिहून सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्रात चार मुद्द्यांवर आक्षेप घेतला आहे.

१) ३० नोव्हेंबरला जाहीर केलेल्या कोरोना नियमांमध्ये राज्य सरकारने मुंबईत पोचणार्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. तर केंद्र सरकारच्या नियमांनुसार, फक्त जोखीम असलेल्या देशातून येणार्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल. किंवा ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांना चाचणी करावी लागेल.

२) महाराष्ट्र सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तरी त्यांना १४ दिवस गृहविलगीकरणात राहणे अनिवार्य केले आहे. तर केंद्राच्या नियमांनुसार, जोखीम असलेल्या देशातून येणार्या प्रवाशांनाच १४ दिवस गृहविलगीकरणात राहणे अनिवार्य केले आहे.

३) राज्य सरकारच्या नियमानुसार, ज्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मुंबईवरून देशांतर्गत विमानाने प्रवास करायचा आहे, त्यांनासुद्धा मुंबई विमानतळावर आधी आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल. निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच ते हवाई प्रवास करू शकतील. तर केंद्र सरकारच्या नियमानुसार, अंतिम विमानतळावर पोचल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल.

४) इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणार्या प्रवाशांना ४८ तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवणे अनिवार्य केल्याच्या राज्य सरकारच्या नियमावरही केंद्र सरकारने आक्षेप नोंदवला आहे. केंद्राच्या नियमांतर्गत देशांतर्गत प्रवासासाठी असे नियम नाहीत. तरीही आवश्यक वाटल्यास ७२ तासांपूर्वी चाचणी करावी लागणार आहे. राज्य सरकारने तत्काळ आपले नियम बदलून केंद्राच्या दिशानिर्देशांनुसार नियम तयार करावे, अशा सूचना केंद्राने राज्य सरकारला केल्या आहेत. तसेच नागरिकांना असुविधा होऊ नये यासाठी या नियमांची सविस्तर माहिती सामायिक करावी, अशा सूचनाही केंद्राने केल्या आहेत.

परदेशातून वा परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी जी नियमावली करायची आहे, त्यात केंद्र सरकारच्या आणि राज्याच्या नियमावलीत तफावत होती, ती तफावत आता दूर करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. pic.twitter.com/jMsEM1QQgm

— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 2, 2021

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ; ७ डिसेंबरपर्यंत मुदत

Next Post

नाशिकमध्ये पावसाने मोडले आजवरचे सर्व विक्रम

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिकमध्ये पावसाने मोडले आजवरचे सर्व विक्रम

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011