गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यभरात अशी आहे पूरस्थिती… या ठिकाणी पथके तैनात…

by India Darpan
जुलै 20, 2023 | 5:21 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय हवामान विभागाने २१ जुलैपर्यंत काही जिल्ह्यांना दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व जिल्हाधिकारी यांनी पूर परिस्थीतीवर लक्ष ठेवावे तसेच कोणतीही मदत लागल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि आपल्याशी तत्काळ संपर्क साधावा, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्यात.

रत्नागिरी, रायगड, गडचिरोली, ठाणे, मुंबई शहर, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्हाधिकाऱ्यांशी मंत्री श्री. पाटील यांनी संवाद साधला. रत्नागिरी, रायगड, गडचिरोली या जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती आहे. परंतू एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ची बचाव पथके कार्यरत असून जीवीत हानी झालेली नाही. सद्यस्थितीत रत्नागिरी – ८७, रायगड ९९१, ठाणे जिल्ह्यात ४५८ लोकांना तर पालघर जिल्ह्यात ८७ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिली.

गडचिरोली जिल्ह्यात चार रस्ते बंद असल्यामुळे १६८८ गावांपैकी १०० गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील राजोली गावातील १८ लोकांना काल निवारा केंद्रात हलवण्यात आले होते मात्र आता पूर परिस्थिती सामान्य झाल्याने त्यांना मूळ गावी परत पाठविण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात ६ नद्यांपैकी कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा या ३ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. एनडीआरएफची चमू चिपळूणला तैनात करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जगबूडी व वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली असुन चिपळूण मधील ६५ तसेच खेड मधील २२ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती संबंधित जिल्हाधिकारी यांनी व्हिसीद्वारे दिली. जिल्हा व राज्यस्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असुन मदत व बचावकार्य सुरळीत आहे, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक आप्पासो धुळाज यांनी सांगितले.

राज्यात येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर २४ x ७ नियंत्रण कक्ष सुरु आहे. नदीच्या पुरामुळे नदीने बाधित गावांना सर्तकतेचा इशारा स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आलेला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्द्याला उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सचेत प्रणालीद्वारे राज्यस्तरावरून पूर्व इशारा म्हणून सूचित करण्यात आले आहे. गडचिरोली १५ लाख, रायगड ४० लाख तसेच वर्धा, चंद्रपूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पूरप्रवण क्षेत्रांतील नागरिकांना इशारा दिलेला आहे. बचाव पथक व जिल्हाधिकारी कार्यालय हे सातत्याने समन्वय ठेवून हवामानाचा अंदाज व सद्य:स्थिती व स्थानिक स्थितीचे आकलन करुन बचाव पथके तैनात केलेली आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात १८ नागरिकांना निवारा क्षेत्रात हलवले होते. आता पूर परिस्थिती सामान्य झाल्याने त्यांना मूळ गावी पाठविण्यात आले. भामरगडमधील गडचिरोलीतील १,६८४ गावांपैकी १०० गावे पुलावर पाणी आल्याने संपर्कात नाही. भामरगड तालुक्यातील गावे आहेत. एसडीआरएफचे एक पथक तैनात आहे. ३१ जवानांपैकी १ उपनिरीक्षक व ८ जवान मिळून एक पथक असे तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केली आहेत. रत्नागरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड येथील एकूण ८७, रायगड येथील ९९१, ठाणे जिल्ह्यातील ४५८ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

सद्य:स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे व रायगड रसायनी या भागात पूर परिस्थिती आहे. बचाव पथके कार्यरत असल्याने जीवितहानी झाल्याची नोंद नाही. राज्यात सर्व जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे. मात्र, सद्यस्थितीत गडचिरोली, रायगड व रत्नागिरी जिल्हे वगळता उर्वरीत जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. पूर परिस्थितीबाबत बचाव कार्यासाठी म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या पथकांना आपत्कालिन परिस्थितीकरिता पूर्व तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफचे पथक पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई तर, एसडीआरएफची पथके गडचिरोली, नांदेड येथे तैनात केली आहेत, असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २० जुलै २०२३ रोजी रेड अलर्ट असलेले जिल्हे निरंक असून ऑरेंज अर्लट असलेले जिल्हे रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सातारा, पुणे असे आहेत. चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया (ऑरेंज अलर्ट म्हणजे २४ तासांत जर ११५ ते २०४ मि.मी. पाऊस एका ठिकाणी पडत असल्यास ऑरेंज अलर्ट म्हटले जाते.) म्हणून त्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी बचाव पथकासह तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. २१ जुलै २०२३ रोजी रेड अलर्ट निरंक असून ऑरेंज अलर्ट – रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे या जिल्ह्यात असून २२ जुलै २०२३ रोजी रेड अलर्ट – निरंक असून- रायगड, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

जलसंपदा अंतर्गत असणाऱ्या धरणातून सोडणाऱ्या विसर्गाचे नियंत्रण केले जात असून अतिवृष्टी पूर व धरणातून विसर्ग यामध्ये प्रभावी संनियंत्रण व विभागामध्ये समन्वय ठवून जीवित व वित्त हानी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. होणाऱ्या नुकसानीचे सर्वेक्षण हे शासनाच्या प्रचलित स्थायी आदेशानुसार करण्याचे निर्देश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. चिपळूण मधील वाशिष्टी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलंडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील राजोली, हालेवारा, एटापल्ली या गावातील लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

रायगड व गडचिरोली, पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्याने पूर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे या जिल्ह्याची उद्याची स्थानिक स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेतील. गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस झालेले ०५ जिल्हे मुंबई शहर (९८.४), रायगड (१६३), सिंधुदुर्ग (११८.६), रत्नागिरी (९३), ठाणे (८०.४) असे आहेत, अशी माहिती मंत्री श्री. पाटील यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील या ५१ गावांचे रुपडे पालटणार… मॉडेल व्हिलेजसाठी निवड… बघा, तेथे काय काय होणार

Next Post

केंद्रीय मंत्री कराडांना हवे मुंबईत घर.. म्हाडाकडे केला अर्ज… एवढी आहे किंमत

India Darpan

Next Post
Bhagwat Karad

केंद्रीय मंत्री कराडांना हवे मुंबईत घर.. म्हाडाकडे केला अर्ज... एवढी आहे किंमत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011