India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

उघडा डोळे आणि वाचा नीट! अर्थसंकल्पातील तब्बल निम्मा निधी अखर्चित; आता दीड महिनाच शिल्लक

India Darpan by India Darpan
February 17, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी सादर होणारा अर्थसंकल्प विकासाची वर्षभराची वाटचाल दर्शवित असतो. यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात विकासकामांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीतील निम्म्याहूनही कमा अर्थात केवळ ४७ टक्केच निधी खर्च होऊ शकला आहे. याचीच दुसरी बाजू म्हणजे अर्ध्याहून अधिक निधी अखर्चित आहे. उर्वरित निधी खर्च करण्यासाठी केवळ दीड महिन्यांचा कालावधीच शिल्लक असून ऐवढा अवाढव्य निधी खर्च करणे अशक्य असल्याचे अर्थतज्ज्ञ मानतात.

अर्थसंकल्पित अर्धानिधी खर्च न होणे राज्याची आर्थिक शिस्त बिघडल्याचे हे द्योतक असल्याचे मानले जात आहे. २०२२-२३च्या अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी आणि विकासकामांसाठी ६ लाख ४६ हजार ५३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. १४ फेब्रुवारीपर्यंत त्यापैकी केवळ ३ लाख ४ हजार ४३० कोटी रुपये निधीच खर्च करता येऊ शकला आहे. अर्थात ५३ टक्के निधी अखर्चित राहिला आहे. कितीही प्रयत्न केले तरी पुढच्या दीड महिन्यात अर्थात ३१ मार्चपर्यंत अर्थसंकल्पित एकूण खर्चाच्या रकमेच्या ६० टक्क्यांहून अधिक खर्च करताय येऊ शकत नसल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जास्त निधी खर्च केलेले विभाग असे
शालेय शिक्षण ५५,८२३.४ कोटी (७८.८ %)
तंत्रशिक्षण विभाग १०,०४४.७ कोटी (७६.३ %)
सहकार ५५६८.३ कोटी (७४.९%)
विधी व न्याय विभाग २७,७७६ कोटी (७२.१ %)
गृहविभाग २२,७१७ कोटी (६४.३ %)

मंत्रिमंडळ विस्तारास विलंबाचा फटका
यंदा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल ते जून हे तीन महिने महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सरकारचा विस्तार होईपर्यंत ४० दिवस हे दोघेच राज्याचा कारभार चालवत होते. विस्तार झाल्यानंतर १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यानंतर २० जणांचे मंत्रिमंडळ राज्याचा कारभार चालवत आहे. मंत्रिमंडळ विस्तारास होत असलेल्या विलंबामुळे निधीच्या खर्चावर झाला असल्याचे जाणकार सांगतात.

Maharashtra Budget Half Fund Left Delay Work


Previous Post

शिर्डी, शनिशिंगणापूर येथील बालकांच्या वेठबिगारीबद्दल बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष म्हणाल्या….

Next Post

सावधान! बिस्किटे, नूडल्स, पास्ता, पिझ्झा, चिप्स, चॉकलेट घेताय? आधी हे वाचा मग, ठरवा

Next Post

सावधान! बिस्किटे, नूडल्स, पास्ता, पिझ्झा, चिप्स, चॉकलेट घेताय? आधी हे वाचा मग, ठरवा

ताज्या बातम्या

फोटोशूटमुळे ट्रोल झाली अभिनेत्री प्राजक्ता माळी

June 7, 2023

नीती आयोगाकडून महाराष्ट्र ब्लॉकचेन जात प्रमाणपत्र प्रकल्पाचे कौतुक… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

June 7, 2023

राज्यात या ४ ठिकाणी होणार उदंचन जलविद्युत प्रकल्प… इतक्या विजेची निर्मिती होणार

June 7, 2023

मुंबईत आता किलबिलाट रुग्णवाहिका… अशी आहे तिची वैशिष्ट्ये…

June 7, 2023

त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मंगेश पाटील यांची गगन भरारी

June 7, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज

June 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group