मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करीत आहेत. तत्पूर्वी फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. महाराजांना पुष्पहार अर्पण केला. अपेक्षेप्रमाणे फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
अर्थमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार, फडणवीसांकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर. याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये मिळतील. प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार आहे. केंद्र सरकारचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना प्रतिवर्ष मिळणार आहेत. राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. तशी घोषणा फडणवीसांनी विधिमंडळात केली.
https://twitter.com/InfoRaigad/status/1633764238350221313?s=20
फडणवीसांची दुसरी मोठी घोषणा पीर विम्याबाबत आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना मिळणार आहे. आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकर्यांकडून घेतली जाणार. आता शेतकर्यांवर पीक विम्याचा कोणताच भार नाही. राज्य सरकार हप्ता भरणार. यासाठी राज्य सरकार 3312 कोटी रुपयांचा भार उचलणार
https://twitter.com/MahaDGIPR/status/1633760891345747968?s=20
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा आणि तरतुदी अशा
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प.
पंचामृत ध्येयावर आधारित
१. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
२. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
३. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
४. रोजगारनिर्मिती
५. पर्यावरणपूरक विकास
– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदाचे हे 350 वे वर्ष. यानिमित्त या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद
– आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारणार. त्यासाठी 50 कोटी रुपये
– मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने उभारणार : 250 कोटी रुपये
– शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारणार. तसेच, शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपये
– महिलांना राज्य परिवहन महामंडळांना बस प्रवासाच्या तिकीट दरात सरसकट 50 टक्क्यांची सूट;
– महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचारखर्च दीड लाखावरुन 5 लाख करण्यात येणार.
– राज्यभर ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ अंतर्गत 700 दवाखाने सुरु करणार.
विधानसभेत फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करीत आहेत. बघा, त्याचे हे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1633747351125762048?s=20
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा आणि तरतुदी अशा
– गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
– गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
– आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
– धनगर समाजाला 1000 कोटी रुपये
– महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
– राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत
– चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
– महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
Maharashtra Budget 2023 Big Announcement for Farmers