बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सीमाप्रश्नी आता कर्नाटक सरकारची नवी भूमिका; महाराष्ट्र सरकार काय करणार?

by Gautam Sancheti
डिसेंबर 23, 2022 | 7:24 pm
in संमिश्र वार्ता
0
CM Basavraj Bommai

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद उफाळून आला असून, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेने आता सभागृहात वादग्रस्त ठराव घेऊन या वादाला आणखी आणखी फोडणी दिली आहे.  मुख्यमंत्री बोम्मई यांनी ठराव मांडताना सांगितले की, गेल्या १८ वर्षांपासून प्रलंबित असेला सर्वोच्च न्यायालयातील खटलाच आम्हाला मान्य नाही. सीमाप्रश्न सोडविण्याचा अधिकार हा न्यायालयाला नाही तर संसदेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यातून मुख्यमंत्र्यांचा खोडसळपणा आणि दुट्टपी धोरण दिसून येते.

बोम्मई पुढे म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा संपलेला अध्याय आहे. महाजन अहवाल सादर होऊन ६६ वर्षे झाली आहेत. दोन्ही राज्यांतील जनतेत सौहार्दपूर्ण वातावरण आहे. कर्नाटकची भूमी, पाणी, भाषा आणि कन्नड जनतेच्या हिताच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशीही भूमिका बोम्मई यांनी जाहीर केली. कर्नाटकातील जनता आणि सभागृहाचे सदस्य यांची एकच भावना आहे. याला कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सगळे मिळून घटनात्मक आणि कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ. महाराष्ट्र अनावश्यक सीमावाद उकरून काढत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. राज्याचे हित जपण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे देखील या ठरावात म्हटले आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारकडून गेल्या काही दिवसांतील महाराष्ट्रातील नेत्यांच्या वक्तव्यांचाही निषेध करण्यात आला. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे देशद्रोही असून, ते चीनचे एजंट आहेत, असे वाटते. त्यामुळे चीनप्रमाणे हल्ला करू, असे वक्तव्य करणाऱ्यांना आम्ही काडीचीही किंमत देत नाही. अशा तऱ्हेची प्रक्षोभक विधाने त्यांनी पुन्हा केली तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही बोम्मई यांनी दिला आहे.

यावेळी महाराष्ट्रातील नेत्यांचा एकमताने निषेध करण्यात आला. महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील सीमाप्रश्न सुटावा यासाठी २००४ पासून महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च नायायालयात खटला दाखल केला. या खटल्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत दोन्ही राज्यांनी एकमेकांविरुद्ध भूमिका घेऊ नये, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केली. मात्र एकीकडे कर्नाटक विधीमंडळात संमत झालेल्या ठरावात सीमाप्रश्न सोडवण्याची जबाबदारी देशाच्या संसदेची असून सर्वोच्च न्यायालयाला तो अधिकार आहे.

मागील १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्यात कर्नाटकने फक्त चालढकल केली तर आता हा खटलाच आपल्याला मान्य नाही, असे कर्नाटक म्हणत आपला दुपट्टीपणा जाहीर केला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे. कर्नाटक विधिमंडळात महाराष्ट्राला एकही इंचही जागा न देण्याचा ठराव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मांडला. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला.

दरम्यान, महाराष्ट्राच्या निर्मितीपासून धगधगत राहिलेला सीमाप्रश्न सुटावा यासाठी शेवटची आशा म्हणून सीमा भागातील मराठी जनता सर्वोच्च नायालयातील खटल्याकडे पाहत आली आहे. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील या खटल्यात मागील तब्ब्ल १८ वर्षांमध्ये कर्नाटकने फक्त चालढकलपणा करत हा प्रश्न भिजत कसा राहिल यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकराने या खटल्याला गती देण्याची मागणी सीमा भागातील जनता करत आहे.

Karnataka Government New Stand on Maharashtra Border Dispute
CM Bommai

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक खासगी बस अपघातानंतर आता हे सक्तीचे; राज्य सरकारची विधान परिषदेत माहिती

Next Post

अखेर ‘त्या’ पोलिस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली; १५ दिवसात चौकशीचेही आदेश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
Nagpur Adhiveshan

अखेर 'त्या' पोलिस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली; १५ दिवसात चौकशीचेही आदेश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011