रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अजितदादांनी कांदा उत्पादकांची दिशाभूल करु नये…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

by Gautam Sancheti
ऑगस्ट 10, 2024 | 3:59 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240810 WA0324 1 e1723285756670

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनिमित्त गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल जाहीर सभेतून बोलताना यापुढे केव्हाही कांद्याची निर्यातबंदी होणार नाही असे वक्तव्य केले आहे. परंतु होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त शेतकरी मतदान आकर्षित करण्यासाठीचे हे एक राजकीय वक्तव्य आहे असा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केला आहे.

कोणत्याही परिस्थितीत यापुढे कांदा निर्यातबंदी करायची नाही असे आमच्यात एकमत झाले आहे असे अजितदादा पवार सांगत असले तरी कांद्याच्या आयात निर्यातीचे धोरण ठरविणाऱ्या केंद्र सरकारमधील संबंधित जबाबदार मंत्र्यांनी याबाबत अजून अधिकृत कोणतेही भाष्य केलेले नाही.

एकीकडे अजितदादा कांद्याची निर्यातबंदी यापुढे होणार नाही असे सांगत असतांना गेल्या वर्षभरापासून कांदा निर्यातीवर लागू असलेले ४० टक्के निर्यातशुल्क अजूनही जैसे थे आहे, तसेच साडेपाचशे डॉलरचे किमान निर्यातमूल्य कांदा निर्यातीवर आकारले जात आहे. अजितदादांनी केंद्र सरकारकडून आधी हे ४० टक्के निर्यात शुल्क आणि ५५० डॉलरचे किमान निर्यात मूल्य तत्काळ शून्य करून घ्यावे.

केंद्रातील विद्यमान सरकारच्या मागच्या दहा वर्षातील कांदा विषयीचे धोरण बघितलं तर त्यानुसार शेतकऱ्यांचा कांद्याचा थोडाफार दर वाढला की तत्काळ केली जाणारी सततची कांदा निर्यातबंदी परदेशातून कांदा आयात करणे त्याचबरोबर कांद्यावरती निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य असे विविध बंधने घालून थेट शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर पाडण्याचे काम केले गेले आहे.
कांदा निर्यात बंदीमुळे दरात प्रचंड घसरण होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मतपेटीतून आपला हिसका दाखवल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी कांदापट्ट्यातील अपवाद वगळता सर्वच सर्व जागा या महायुतीला गमावल्या लागल्यानंतर आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मतदारांना आकर्षित करण्यासाठीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कांद्याची निर्यातबंदी न होण्याचे राजकीय आश्वासन देत असल्याचे मत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे.

निर्यातबंदी यापुढे करणार नाही असे सांगण्यासाठी अजित दादांनी आत्ताच वेळ का निवडली याबाबतही कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे. ७ डिसेंबर २०२३ रोजी कांदा निर्यातबंदी झाली होती. ३१ मार्च २०२४ ला उठणारी ही कांदा निर्यात बंदी ४ मे २०२४ ला उठवली गेली. तसेच मागील एक वर्षापासून असलेले ४० टक्के निर्यात शुल्कही अजून कायम आहे, या संपूर्ण कालावधीमध्ये हेच अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते. मग इतक्या दिवस निर्यातबंदी उठवण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राकडे त्याच वेळेस निर्यातबंदी उठवण्यासाठी योग्य असा पाठपुरावा का केला नाही असाही प्रश्न कांदा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी उपस्थित केला केला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हैद्राबाद येथे घर घेण्यासाठी दोन कोटीची मागणी, सासरच्या मंडळीकडून विवाहीतेचा छळ…१४ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

मेडिकल स्टोअर्समध्ये चॉकलेट खरेदीचा बहाणा…महिलेच्या गळयातील मंगळसूत्र चोरट्यांनी केले लंपास

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
Next Post
crime 118

मेडिकल स्टोअर्समध्ये चॉकलेट खरेदीचा बहाणा…महिलेच्या गळयातील मंगळसूत्र चोरट्यांनी केले लंपास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011