इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
झिम्बाब्वे दौऱ्याच्या टी२० पाच सामन्यांच्या मालिकेत पहिलाचा सामना भारताने गमावला. विश्वचषकानंतर हा पहिला सामना होता. त्यामुळे रंगात भंग या सामन्याने केले. झिम्बाब्वेने भारताला १३ धावांनी पराभूत केले. कर्णधार शुबमन गिल याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झिम्बाब्वेने २० षटकात ९ गडी गमवून ११५ धावा केल्या.
त्यानंतर भारतीय फलंदाज ११६ धावा घेऊन मैदानात उतरला. पण, भारतीय संघ १०२ धावात गारद झाला. या सामन्यात १३ धावांनी पराभूत झाला. कर्णधार शुबमन गिलने एकाकी झुंज दिली. त्याने २९ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. आयपीएलमध्ये हिरो ठरलेले अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच फेल ठरले. अभिषेक शर्माला खाते उघडता आले नाही. रियाने परागने २, तर ध्रुव जुरेलने ७ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने ३४ चेंडूत १ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २७ धावा केल्या. मात्र विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.