इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः २०१९ मध्ये निवडून आलेल्या जागांचा निकष लोकसभेसाठी लावण्यात आला होता. कुठल्या पक्षाकडे निवडून आलेली कुठली जागा आहे, त्या आधारावर जागा वाटप करण्यात आले होते; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा आल्या. लोकसभेसारखी विधानसभेला जागा वाटपात गडबड होता कामा नये. आपण महायुतीमध्ये आलो, तेव्हा त्यांनी ८०-९० जागा देण्याचा शब्द दिला होता. भाजपशी आताच बोलून महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत केली.
आज राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुंबईत बैठक बोलावली होती. त्यात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, की लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको. किती जागा हव्या हे त्यांना सांगावे लागेल. ८०-९० जागा मिळाल्या, तर ५०-६० निवडून येणार. तुमचे ५० आहेत, मग ५० घ्या, असे होता कामा नये.