इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी भाजपने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मुंबईत कमी जागा काँग्रेसला देण्यात आल्यामुळे त्या नाराज होत्या. पण, त्यांची नाराजी दूर करत काँग्रेसने त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे.
वर्षा गायकवाड या माजी मंत्री असून त्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या ठिकाणी चांगली लढत होणार आहे.
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2024/04/GMA8_SyXUAAF6t4-813x1024.jpg)