गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुसऱ्यांची पोरं मला कडेवर घेऊन फिरायची नाहीत…मला राजकारणात माझे सहकारी मोठे करायचे – राज ठाकरे

by India Darpan
मार्च 9, 2024 | 12:54 pm
in संमिश्र वार्ता
0
GINe3ykbkAASulp



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन दादासाहेब गायकवाड सभागृहात साजरा होत आहे. या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातंरावर बोचरी टीका केली. यावेळी ते म्हणाले की, दुसऱ्यांची पोरं मला कडेवर घेऊन फिरायची नाहीत. मला राजकारणात माझे सहकारी मोठे करायचे आहेत.

काल नाशिक येथील श्री. काळाराम मंदिरात आज राज ठाकरे यांनी सहपरिवार विधीवत पूजा अर्चना केल्यानंतर आज ते मेळाव्यात बोलत आहे.
यावेळी ते म्हणाले की, राजकारणात प्रचंड संयम लागतो. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संयम असलाच पाहिजे. आज मोदींच्या रूपात भाजपा जे यश अनुभवतोय त्यात मोदींचं श्रेय आहेच पण अनेक दशकांच्या कार्यकर्त्याचीही मेहनत, संयम आणि संघर्ष पण आहे.

यावेळी सोशल मीडियावर बोलतांना ते म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर प्रभावी करा. लोकांना त्यातून माहिती मिळाली पाहिजे फक्त दणदणीत संगीत, रुबाबदार चाल वगैरेने फक्त मनोरंजन होईल. आपण राजकारण-समाजकारणात आहोत. म्हणून मी श्री. केतन जोशी ह्यांची ‘सोशल मीडिया’ मार्गदर्शन शिबिरं आपल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी आयोजित करणार आहे. ज्यांना राजकीय महत्त्वकांक्षा आहे त्यांनी तिथे यावं.

यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात तीनच पक्ष प्रामुख्याने निर्माण झाले. तुम्ही म्हणाल ह्या दरम्यान राष्ट्रवादी हा पक्ष निर्माण झाला… पण निवडून येणाऱ्या लोकांची मोळी होती. त्यामुळे एक जनसंघ, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हेच पक्ष तळागाळातून निर्माण झाले. आणि त्यात विशेष ह्या पक्षातील कार्यकर्ते ९९% सर्वसामान्य घरातील होते.

मनसे आंदोलन अर्धवट सोडते यावर बोलतांना ते म्हणाले की, आम्ही वारंवार सिद्ध करून दाखवलं, समर्पक उत्तरं दिली तरी मुख्य माध्यमांमधून ‘आम्ही आंदोलन अर्धवट सोडतो’ हा अपप्रचार केला गेला. पण मग शिवस्मारकाचं काय झालं? त्रासदायक भोंगे बंदी होणार होती त्याचं काय झालं? त्रासदायक भोंगे आंदोलनात उद्धव ठाकरे सरकारने माझ्या १७००० सहकाऱ्यांवर खटले भरले. असा काय गुन्हा होता त्या मुलांचा? आता कोणताच नेता त्याबद्दल बोलत नाही. माझं सरकार येऊ दे… त्रासदायक भोंगे बंद करून टाकेन.

मराठा आरक्षणाबाबत बोलतांना ते म्हणाले की, मराठा आरक्षणावरून फक्त राजकारण सुरु आहे. मी जरांगे-पाटील ह्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर सांगितलं होतं… आरक्षण मिळणार नाही. ह्याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं नाही तर तांत्रिकदृष्ट्या ते तितकंच किचकट आहे. असेही ते म्हणाले. राज्यात जी मराठा आरक्षणावरून जी आश्वासनं दिली जातात ती सर्व खोटी आहेत. त्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यायला हवा. पण केंद्राने जर मराठा आरक्षण द्यायचं ठरवलं तर त्यांना प्रत्येक राज्यातील आरक्षणाची मागणी असलेल्या जातींना आरक्षण द्यावं लागेल, जे नेत्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरेल म्हणून हा प्रश्न रखडवत ठेवला जातो. आणि जाती भेद निर्माण करून मतांचं राजकारण केलं जातं.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अरे वाह!पेट्रोलपंपावर थेट भगवान शंकराची वेशभूषा धारण केलेल्या मुलाच्या हस्ते ग्राहकांना प्रसाद वाटप

Next Post

रियलमी १२ सिरीज ५ जी लाँच…वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोनची ही आहे किंमत

India Darpan

Next Post
IMG 20240309 WA0302 1

रियलमी १२ सिरीज ५ जी लाँच…वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोनची ही आहे किंमत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011