पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी आणि अनेक राज्यांची जीवनवाहिनी असलेली नर्मदा नदीचे आध्यात्मिक महत्त्वही मोठे आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षात अनेक जणांचा कल नर्मदा परिक्रमा करण्याकडे आहे. यासंदर्भात मात्र, फारशी माहिती उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेऊनच नर्मदा परिक्रमेचे अनेक पदर उलगडणारी लेखमाला ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक आणि लेखक दत्ता भालेराव (मो. 9689038880) हे ‘इंडिया दर्पण’मध्ये लिहीत आहेत. दर आठवड्याला ही लेखमाला प्रसिद्ध होत आहे. या लेखमालेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. अनेकांनी मागणी केल्यानुसार ‘नर्मदे हर’ या लेखमालेची एकत्रित लिंक आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. ही लिंक खालीलप्रमाणे