शुक्रवार, नोव्हेंबर 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत-चीन सीमेवर नेमकं काय घडलं? संरक्षणमंत्र्यांनी संसदेत दिली ही माहिती (बघा व्हिडिओ)

डिसेंबर 13, 2022 | 12:16 pm
in मुख्य बातमी
0
Rajnath Singh

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तणावाच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली आहे. या चकमकी संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज संसदेत यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, “माननीय सभापती/अध्यक्ष,
9 डिसेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये आपल्या सीमेवर घडलेल्या घटनेबद्दल मला या सन्माननीय सदनाला माहिती द्यायची आहे. 9 डिसेंबर 2022 रोजी, पीएलएच्या सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत तेथील स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला.चीनच्या या प्रयत्नांचा आपल्या लष्कराने खंबीरपणे आणि दृढतेने सामना केला. त्यानंतर दोन्ही सैन्यांमध्ये समोरासमोर शारीरिक झटापट झाली मात्र भारतीय लष्कराने शौर्य दाखवत पीएलए ला आपल्या हद्दीत घुसखोरी करण्यापासून रोखले आणि त्यांना त्यांच्या चौक्यांवर परत जाण्यास भाग पाडले. या झटापटीत दोन्ही बाजूचे काही जवान जखमी झाले. मी या सदनाला सांगू इच्छितो की, आपल्या बाजूला जीवितहानी किंवा कोणताही जवान गंभीर जखमी झालेला नाही.

भारतीय लष्करी कमांडर्सनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पीएलएचे सैनिक आपल्या ठिकाणी परत गेले. या घटनेचा पाठपुरावा करत, 11 डिसेंबर 2022 रोजी या भागातील स्थानिक कमांडरने प्रस्थापित व्यवस्थेनुसार , त्यांच्या चिनी समकक्षांसोबत ध्वज बैठक घेतली आणि या घटनेसंदर्भात चर्चा केली. चीनला अशा कृती टाळण्यास तसेच सीमेवर शांतता आणि स्थैर्य राखण्यास सांगण्यात आले. मुत्त्सदेगिरीच्या माध्यमातूनही हा मुद्दा चीनकडे उपस्थित करण्यात आला आहे.

मी या सदनाला आश्वस्त करू इच्छितो कि, आपले लष्कर आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि या विरोधातील कोणतेही प्रयत्न निष्फळ ठरवण्यासाठी सदैव तत्पर आहे. मला विश्वास आहे की, हे संपूर्ण सदन आपल्या जवानांच्या शौर्यपूर्ण प्रयत्नांमध्ये त्यांना एकमुखाने पाठबळ देण्यासाठी उभे राहील. जय हिंद !”

https://twitter.com/rajnathsingh/status/1602551886443270145?s=20&t=Snc2UmrzUJhcFKPWlNB4kg

मे-जून २०२० मध्ये वाद
विशेष म्हणजे १ मे २०२० रोजी पूर्व लडाखमधील पॅंगॉन्ग त्सो सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन्ही बाजूचे अनेक सैनिक जखमी झाले. येथून तणावाचे वातावरण वाढले. यानंतर १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले.
चिनी सैनिक घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जवानांनी त्यांना रोखल्यावर त्यांनी हिंसाचार केला. यानंतर वाद अधिकच वाढला. या चकमकीत दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दगड आणि रॉड फेकण्यात आले. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले, तर ३८ हून अधिक चिनी सैनिक मारले गेले. अनेक चिनी सैनिक नदीत वाहून गेले. मात्र, चीनने केवळ चार सैनिकांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या दुसर्‍या अहवालानुसार या चकमकीत ४५ हून अधिक चिनी सैनिक मारले गेले.

चर्चेच्या अनेक फेऱ्या
१५ जून २०२० रोजी लष्करादरम्यान हिंसक चकमक झाल्यापासून सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही.
तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. यानंतर, फेब्रुवारी २०२१ मध्ये विभक्त होण्याची प्रक्रिया सुरू झाली. लष्करी आणि राजनैतिक पातळीवरील चर्चेनंतर, दोन्ही बाजूंनी पॅंगॉन्ग लेक आणि गोगरा क्षेत्राच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवरील सैन्य पूर्णपणे काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्ण केली. तथापि, एका अहवालानुसार, सध्या दोन्ही देशांचे ५० ते ६० हजार सैनिक एलएसी (वास्तविक नियंत्रण रेषा) च्या संवेदनशील क्षेत्रात तैनात आहेत.

१९६२ पासून वाद
भारत आणि चीनमध्ये सुमारे ३४४० किमीची सीमा आहे. १९६२ च्या युद्धापासून त्याचे बहुतेक भाग विवादित आहेत. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही देशांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी, शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी तोडगा काढण्याचे मान्य केले आहे. वादग्रस्त भागात यथास्थिती कायम ठेवण्याबाबत आणि लष्कराला हटवण्याबाबतही करार करण्यात आला आहे.

India China Troops Clashes in Tawang Sector Defence Minister Parliament
Arunachal Pradesh Border LAC PLA

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद; राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांचा पाठिंबा; बघा, काय काय आहे बंद?

Next Post

‘खडसे राष्ट्रवादी संपवताय, त्यांची आमदारकी परत घ्या’, मंत्री गुलाबराव पाटलांची जोरदार टोलेबाजी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Gulabrao Patil Eknath Khadse

'खडसे राष्ट्रवादी संपवताय, त्यांची आमदारकी परत घ्या', मंत्री गुलाबराव पाटलांची जोरदार टोलेबाजी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011