मुंबई – मराठी कुटुंबांमध्ये नाश्त्यात पोहे खाण्याचे प्रमाण जास्त आहे. एवढेच नव्हे तर चांगल्या प्रसंगालासुद्धा पोह्यांचे महत्त्व आहे. अर्थात मुलीला बघायला मुलगा आला की पाहुण्यांसाठी नाश्त्यात पोहे करण्याचीही प्रथा आहे. पण या नाश्त्याचे महत्त्व केवळ चवीपुरता नसून त्याचे शरीराला देखील वेगवेगळ्याप्रकारचे फायदे होतात. ब्रेकफास्टमध्ये पोहे खाल्ल्याने तुमचे वजनावर नियंत्रण तर राहतेच पण इम्युनिटीसुद्धा वाढते.
आयरन
आपल्या शरीरात आयरनची कमतरता आहे, असे वाटत असेल किंवा डॉक्टरांनी सांगितले असेल तर पोहे खाल्ल्याने ही कमतरता भरून निघते. पोह्यात मोठ्या प्रमाणात आयरन असतात. विशेषतः गर्भवतींनी आणि लहान मुलांनी तर खायलाच हवे. जेणेकरून त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढू शकते.
ऊर्जा निर्माण होते
सकाळी नाश्त्यातून शरीराला कार्बोहायड्रेट्स देण्यासाठी पोहे खाल्ले जाऊ शकतात. जर शरीराला आवश्यक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळाले नाहीत तर शरीरात थकवा मोठ्या प्रमाणात असतो. पण तेच योग्य प्रमाणात मिळाले तर ऊर्जा मिळते. त्यामुळे सकाळी एक प्लेट पोहे खायलाच हवे.
वजन घटवा
पोहे खाल्ल्याने वजन वाढत नाही कारण एका छोट्या वाट्यातील पोह्यांमध्ये कमीत कमी 250 कॅलरीज असतात. यात सोबत आवश्यक व्हिटामीन आणि अँटीअॉक्सीडेंटही आढळतात. त्यामुळे जर तुम्ही डाएटवर असाल तर पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकू नका. शिवाय तुम्हाला पोट जड झाल्यासारखे वाटत असेल किंवा अपचनासारखे वाटत असेल तर पोहे खायला हवे. पोहे सहज पचतात आणि शरीराला पोषकही आहेत.
इम्युनिटी वाढते
वेगवेगळ्या भाज्या खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण मुलं खात नाहीत. अश्यावेळी पोह्यांमध्ये या भाज्या मिक्स करून देऊ शकता. तसे केल्यास पोह्यांमध्ये खनीज, प्रोटीन, आयरन आणि इतर पोषक तत्व वाढतात.