नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने २०१५ मध्ये सुरू केलेल्या सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्किममध्ये आता मोठा बदल झाला आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, सॉवरेन गोल्ड बॉन्डशी संबंधित गुंतवणूकदारांच्या तक्रारीच्या समाधानासाठी प्रक्रिया सुरळीत करण्यात आल्या आहेत. आता गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेकडेही तक्रार करता येईल.
तक्रार करण्याची पद्धत
रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, तक्रारींची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी प्राप्ती कार्यालयाचा (आरओ) नोडल अधिकारी पहिला संपर्कबिंदू असेल. बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एससीएचआयएल) निर्धारित डाक कार्यालय आणि मान्यताप्राप्त शेअर बाजारांबाबत प्राप्ती कार्यालयाचा अर्थ आहे. जर तक्रारींचे निवारण झाले नाही, तर आरओमध्ये प्रसार यंत्रणेच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारीचे निपटारा करण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँकेला तक्रार
जर आरओकडे तक्रार दाखल करण्याच्या एका महिन्याच्या आत कोणतेही उत्तर मिळाले नाही. अथवा गुंतवणूकदारांचे आरओच्या उत्तराने समाधान झाले नाही तर ते [email protected] वर रिझर्व्ह बँकेला तक्रार करू शकतात.
सोन्यात किती गुंतवणूक करावी
सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये दर आर्थिक वर्षात कमीत कमी एक ग्रॅम सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. वैयक्तिकरित्या जास्तीत जास्त ४ किलो, एचयूएफसाठी चार किलो आणि न्यासांसाठी २० किलोपर्यंत सोन्यात गुंवणूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भौतिकरित्या सोन्याच्या मागणीत घट करण्याचा तसेच बचतीला आर्थिक बचतीत स्थानांतरित करण्याचा या योजनेमागील उद्देश आहे. या योजनेंतर्गत गोल्ड बॉन्ड खरेदी केला जाऊ शकतो. रिझर्व्ह बँकेकडून त्याची किंमत ठरविली जाते.