मुंबई – नवे वर्ष सुरू होत आहे. प्रत्येक जण नवी सुरुवात करत आहे. कोरोना महामारीतून सर्वांची सुटका व्हावी, आर्थिक प्रगती व्हावी, सर्व नागरिकांनी प्रेम आणि सद्भावनेने राहावे अशी सर्वांची इच्छा आहे. भविष्यात काय होणार आहे, हे कोणीच सांगू शकणार नाही. परंतु काही जण भविष्य वर्तवत असतात. जगातील प्रसिद्ध भविष्यवक्त्यांमधील बाबा वेंगा हे भविष्यवक्ते होते. बल्गेरियामधील फकीर बाबा वेंगा हे लहानपणापासून नेत्रहीन होते. आता २०२२ मध्ये त्यांनी पाच मोठे भाकित वर्तवले आहे. माध्यमांच्या वृत्तांनुसार बाबा वेंगा यांनी भाकित वर्तवताना भारताचाही उल्लेख केला आहे. बाबा वेंगा यांच्यानुसार २०२२ हे वर्ष कसे जाऊ शकते हे जाणून घेऊया.
उष्णतेची लाट
भारताबद्दलचे भविष्य वर्तवताना बाबा वेंगा म्हणाले की, भारतात तापमान ५० अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. शेतीवर टोळांचे आक्रमण होईल. त्यामुळे देशातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. अशाच प्रकारे २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियासह अनेक आशियाई देशात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. बाबा वेंगा यांनी २००४ रोजी आलेल्या त्सुनामीचे भाकित वर्तवले होते.
नैसर्गिक आपत्ती
बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीनुसार, कोरोना महामारीचा प्रकोप कायम राहणार आहे. नव्या विषाणूचाही हल्ला होऊ शकतो. सायबेरियामध्ये एक नवा विषाणू सापडेल. मानवासाठी धोका ठरू शकतो. जगातील अनेक देशांमध्ये तीव्र भूकंप होण्याची शक्यता असून त्सुनामीही येण्याची शक्यता आहे.
जलसंकट
बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, आगामी वर्षात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नद्यांच्या प्रदूषणामुळे पिण्यासाठी पाणी मिळू शकणार नाही. पाण्याचे नवे स्रोत शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.
(महत्वाची सूचना – इंडिया दर्पण लाइव्ह अशा दाव्यांच्या प्रामाणिकतेची पुष्टी करत नाही. तसेच कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहनही देत नाही.)