इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोना आणि लॉकडाऊनचे अनेक बरेवाईट परिणाम जगभरात दिसत आहेत, जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनमुळे संसर्ग कमी होण्यासारखा काही चांगला परिणाम जाणवत असतानाच त्याचे दुष्परिणाम देखील समोर येत आहेत. भारतात मागील वर्षी लॉकडाऊन सुरू असताना अनेक जण घरातच बसून असल्याने सततच्या खाण्यापिण्यामुळे अनेकांचे वजन वाढले आणि त्यानंतर वजन कमी करणाऱ्या औषधांचा बेसुमार खूप वाढला, असे म्हटले जाते. तसेच सतत बैठे काम आणि विविध प्रकारचा ‘काढा’ सह अन्य उष्ण पदार्थ सेवनामुळे मुळव्याधी सारखे आजार देखील अनेकांना जडल्याचे म्हटले जात आहे. त्याच वेळी युरोपातील इंग्लंड सारख्या देशात मात्र लॉकडाऊनचा वेगळाच दुष्परिणाम समोर येत आहे, ‘पिने वाले को पिने का बहाना चाहिये!’ असे म्हटले जाते. ब्रिटनमध्ये हे शब्दशः खरे ठरत आहे.
कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांदरम्यान ब्रिटनमध्ये एक नवी समस्या निर्माण झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात येथे नागरिक अंमली पदार्थांच्या व्यसनाचे बळी ठरले आहेत. देशात कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांमध्ये मानसिक तणाव असल्याची चर्चा आहे. यासोबतच दारूचे व्यसन असलेल्यांबाबतही चिंता निर्माण झाली आहे.
ब्रिटनमध्ये झालेल्या आणखी एका संशोधनात असे समोर आले आहे की, कोरोना महामारीच्या काळात अल्कोहोलचे सेवन वाढले होते. यामुळे ब्रिटनमधील लाखो नागरिक हे व्यसनाच्या आहारी गेले. लॉकडाऊनचा समाजावर घातक परिणाम झाल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्टच्या अध्यक्ष आणि मानसोपचारतज्ज्ञ प्रोफेसर ज्युलिया सिंक्लेअर यांनी सांगितले की, कोरोना संसर्गामुळे देशव्यापी लॉकडाऊनमुळे नागरिक त्यांच्या घरात कैद झाले आहेत. लॉकडाऊनमुळे देशात दारूचा खप वाढला असे प्रो. ज्युलिया यांचे मत असून त्यांनी सांगितले की, सामान्य दिवशी लोक दारू पिण्यासाठी पब इत्यादी ठिकाणी जात असत, येथे तासनतास वेळ लागत असे. त्यामुळे अनेकवेळा लोक वेळेच्या कमतरतेमुळे दारू पिऊन घरी जात असत.
एका आठवड्यात 50 युनिटपर्यंत अल्कोहोलचे सेवन केले जाते. या अभ्यासात अल्कोहोल पिण्याच्या समस्येचे मूल्यांकन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने विकसित केलेल्या ऑडिट नावाच्या गुणांचा वापर केला आहे. याबाबत प्रो. ज्युलिया म्हणतात की, मद्यपान करणार्यांमध्ये मानसिक गोंधळ किंवा मेंदूचा थरकाप होऊ शकतो. त्यामुळे अनेकवेळा त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागते. त्याच वेळी, कधीकधी ते मृत्यूचे कारण देखील बनते. त्यामुळे परिस्थितीत आरोग्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. कारण प्रौढ व्यक्ती दर आठवड्याला 14 युनिटपेक्षा जास्त अल्कोहोल पचवू शकत नाही. अल्कोहोलचे अती सेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते.