मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीचे ब्रेकअप गेल्या दोन दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्याचे अचानक असं विभक्त होणं चाहत्यांसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. दरम्यान, आता त्यांच्या ब्रेकअपचे कारणही समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, लग्नाच्या विषयामुळे दोघांचे नाते तुटले आहे.
टायगरच्या मित्राने मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हणल्यानुसार, टायगर आणि दिशा यांच्यातील ब्रेकअपचे कारण लग्न असल्याचा दावा करण्यात आला आहे. जॅकी श्रॉफ आणि त्याची पत्नी आयशा वेगळे राहायला लागल्यापासून टायगर दिशासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांचे संबंध खूप दिवसांपासून होते आणि आता लग्न करावे, असे दिशाला वाटत होते. पण टायगर अजून लग्नासाठी तयार नव्हता. त्यांच्या मित्राच्या म्हणण्यानुसार दिशाने टायगरशी अनेकदा लग्नाविषयी विचारणा केली होती. परंतु प्रत्येक वेळी त्याचे उत्तर ‘नाही’ असे होते.
तरी दिशाची नाराजी नाही..
टायगरच्या मित्राच्या म्हणण्यानुसार दिशाने हे ब्रेकअप अतिशय सकारात्मक पद्धतीने घेतले आहे. ती टायगरवर रागावलेली नाही. त्याचबरोबर त्याने असेही म्हटले आहे की, काही काळानंतर दोघे पुन्हा एकत्र येतीलही!
जॅकी श्रॉफने मौन सोडले
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जॅकी श्रॉफने दोघांच्या नात्यावर मौन सोडले. “टायगर आणि दिशा नेहमीच मित्र होते आणि अजूनही आहेत. मी अजूनही त्यांना एकत्र बाहेर जाताना पाहतो. मी माझ्या मुलाच्या लव्ह लाईफमध्ये फारशी दखल देत नाही. मला त्यांच्या गोपनीयतेत ढवळाढवळ करायची नाही. पण मला वाटते की ते दोघं खूप चांगले मित्र आहेत. कामाव्यतिरिक्त त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायलाही आवडतो”, असं जॅकी म्हणाला.
Actress Disha Patni Actor Tiger Shroff Breakup Reason Entertainment Bollywood