अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयात दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच जोरदार हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड तालुक्यात ढगफुटी सदृष्य मुसळधार पाऊस झाल्याने शेतक-यांनी लागवड केलेल्या टॅमॅटो व सोयाबीन पिकाच नुकसान झाले आहे. अनेक शेतामध्ये पाणी साचल्याने शेतांना तळ्याच स्वरुप प्राप्त झाले आहे. तर नदी वाहते त्याप्रमाणे पाणी शेतातून वाहत असल्याच दृष्य सर्वत्र पहावयास मिळात आहे. शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी शेतक-यांना मात्र मोठी कसरत करावी लागत आहे.