चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परतीच्या पावसाने मंगळवारी निफाड,चांदवड तालुक्यात सायंकाळी व रात्री उशिरा पर्यंत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने चांदवड तालूक्यात पावासाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी उभा मका आडवा झाला आहे. तर सोयाबीन पिकाला त्याचा फटाका बसला आहे. पीकांमध्ये रात्री पाणीच पाणी साचले होते. गेल्या काही दिवसांपासून चांदवड तालुक्यात पावसाने मोठे नुकसान झाल्याने सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाईची मागणी शेतक-यांनी केली आहे.