नाशिक – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ६९ टक्के साठा असून तो गेल्या काही दिवसापासून स्थिर आहे.. आळंदी, भावली, वालदेवी, कडवा, हरणबारी, नागासाक्या, माणिकपुंज ही सात धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. तर नांदुरमधमेश्वर धरणात ९६ टक्के साठा आहे. १६ हून अधिक धरणात ५० टक्के पेक्षा जास्त साठा आहे. गंगापूर धरणाचा साठा ९२ टक्के आहेत. तर समुहात ८५ टक्के साठा आहे . भोजापूर व तिसगाव धरणात कमी साठा आहे.