गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘रविंद्रनाथ टागोर काळे होते, म्हणून…’; केंद्रीय शिक्षण राज्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

by India Darpan
ऑगस्ट 19, 2021 | 10:54 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
E8G3YBLUUAY1YUN

कोलकाता (पश्चिम बंगाल) – कोणताही नेता हा जनतेचा प्रतिनिधी म्हणजेच लोकप्रतिनिधी असतो. त्यामुळे सहाजिकच त्याने कोणत्याही गोष्टीबद्दल विधान करताना विचारपूर्वकच बोलायला हवे, असा संकेत आहे. परंतु अलीकडच्या काळात काही लोकप्रतिनिधी आपल्या मनाला येईल ते बोलत असल्याने त्यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरते. त्यातून मग वादविवाद किंवा वादंग निर्माण होते, अशीच घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी नोबेल पारितोषिक विजेते, प्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून वादाला तोंड फोडले आहे. सुभाष सरकार हे झारखंडमधील भाजपचे राज्य प्रभारी आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. बुधवारी पश्चिम बंगालच्या विश्व भारती विद्यापीठातील एका कार्यक्रमात ते म्हणाले की, रवींद्रनाथ टागोर काळ्या रंगाचे असल्यामुळे त्यांच्या दत्तक आईने त्यांना कडेवर घेण्यास नकार दिला होता. टागोर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत काळे होते, तर इतर सदस्य रंगाने गोरे होते, त्यामुळे टागोरांच्या आईने आणि इतरांनी त्यांना दत्तक घेण्यास नकार दिला होता. तसेच त्याच्या आईने त्याकाळात ‘त्या’ बाळाला तेव्हा कडेवर घेतले नाही, तरीही त्याच बालकाने पुढे भारताचे नाव जगात उज्ज्वल केले.

दरम्यान, टीएमसीचे ज्येष्ठ नेते अनुब्रत मंडळ यांनी या मुद्यावर सांगितले की, केंद्रीय मंत्री सुभाष यांना रवींद्रनाथ टागोरांबद्दल काहीच माहिती नाही आणि म्हणूनच ते त्यांची बदनामी करत आहेत. सुभाष सरकारला असे कसे बोलत आहेत ? त्याचा जन्म टागोरांच्या आधी झाला होता का? असा सवाल मंडळ यांनी उपस्थित केला आहे. वास्तविक स्वातंत्र्यपूर्व काळात रवींद्रनाथ टागोर हे प्रसिद्ध बंगाली लेखक आणि नोबेल पारितोषिक विजेते होते. तसेच ते विश्व भारती विद्यापीठाचे संस्थापकही होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – खरा फोन

Next Post

बँकेत तुमचे लॉकर आहे? मग हे नक्की वाचा

India Darpan

Next Post
bank locker

बँकेत तुमचे लॉकर आहे? मग हे नक्की वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011