बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काँग्रेसच म्हणते, काँग्रेस आमदार आहे चक्क भाजपचा एजंट; कसं काय?

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 2, 2021 | 11:55 am
in संमिश्र वार्ता
0
congress

नवी दिल्ली –  काँग्रेस पक्षामध्ये सध्या नक्की काय सुरू आहे, असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. पंजाब असो की विविध राज्यात अनेक ठिकाणी पक्षांतर्गत कलह गाजत आहे. आता आसाम काँग्रेसमधील एक बाब समोर आली आहे. आपलाच आमदार हा खुद्द भाजपचा एजंट असल्याची तक्रार खुद्द काँग्रेस पक्षाने केली आहे. पक्षाच्या धोरणांविरुद्ध वक्तव्य केल्यामुळे या आमदाराला प्रदेश काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या आमदाराने सांप्रदायिक सद्भावाला तडा लावणारे वक्तव्य केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे.

शर्मन अली अहमद असे या काँग्रेस आमदाराचे नाव आहे. त्यांना दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, तुम्ही काँग्रेसचे सदस्य असतानाही भाजपचा एजंट असल्यासारखे काम करत आहात. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्याशी जवळीक असल्यामुळे तुम्हाला निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे नुकसान करण्यासाठी प्रायोजित करण्यात आले आहे.

एक आमदार म्हणून तुम्ही माध्यमांमध्ये केलेल्या सांप्रदायिक आणि प्रक्षोभक वक्तव्यामुळे मागील आसाम आंदोलनाच्या जखमांवरील खपली पुन्हा निघाली आहे. सर्व समाजाच्या नागरिकांबाबत तुम्ही केलेले वक्तव्य पूर्णपणे असंवेदनशील आणि अनावश्यक आहे. पोटनिवडणुकीपूर्वी तुम्ही केलेले वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित असून, त्यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याचे मानण्यात आले आहे. नोटीस मिळाल्याच्या तीन दिवसांच्या आत आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना आपले उत्तर पाठवावे असे निर्देश दिले जात आहेत.

काय केले वक्तव्य
शर्मन अली अहमद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, १९८३ मध्ये आसाम आंदोलनादरम्यान धौलपूर परिसरात संशयित बांगलादेशी नागरिकांनी मारलेले आठ नागरिक शहीद नसून खूनी होते. त्यांनी (माजी मंत्र्यांच्या भावासह आठ नागरिक) आसाम आंदोलनाच्या नावावर अनेक नागरिकांचा खून केला होता. ग्रामस्थ त्यांना घाबरत होते त्यामुळे स्वसंरक्षणार्थ ते त्यांना ठार मारत होते. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी त्यांच्यावर टीका करून विनाअट माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंदिर प्रवेशाबाबत शेगाव संस्थांनची मोठी घोषणा

Next Post

जिओच्या तक्रारीनंतर या दोन टेलिकॉम कंपन्यांना तब्बल ३०५० कोटींचा दंड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
संग्रहित फोटो

जिओच्या तक्रारीनंतर या दोन टेलिकॉम कंपन्यांना तब्बल ३०५० कोटींचा दंड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार 1 1920x1280 1

नाशिक येथील ‘आयटीआय’सह राज्यातील या पाच औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार….विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

जुलै 9, 2025
Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011