बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुख्यमंत्री आज मनमाडमध्ये! आमदार कांदेंनी करुन दाखवलं.. करंजवण योजनेचे भूमीपूजन… मनमाडकरांना कायमचा दिलासा मिळणार

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 13, 2023 | 10:09 am
in स्थानिक बातम्या
0
kande shinde1 e1668585063751

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड शहरासाठी अत्यंत महत्वपुर्ण समजल्या जाणा-या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजनेचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मनमाड येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य़मंत्र्यांसह उद्योगमंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा येणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली आहे. तब्बल ३७५ कोटींच्या निधीतून ही योजना १८ महिन्यात पूर्ण होणार आहे. सध्या ११ किमी पाईप लाईन टाकण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नांदगाव मतदारसंघातील अन्य कामांचे उद्घाटन व काही कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्यात येणार आहे.

मनमाड शहर गेल्या ५० वर्षांपासून पाणी टंचाईशी झुंजत आहे. पण, येथील पाणीप्रश्नाकडे कधीही गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही. पण, आ. सुहास कांदे यांनी या योजनेचा पाठपुरावा करुन ती मंजुर करुन त्याचे कामही सुरु केले. या योजनेतून शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटू शकणार आहे. रेल्वेचे मोठे जंक्शन व मध्यवर्ती ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनमाड शहारात पाण्याचा प्रश्न हा नेहमी कळीचा मुद्दा होता. सुमारे एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या शहरातील नागरिकांना शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या वागदर्डी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. १९७४ साली या धरणाची निमिर्ती करण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या सुमारे तीस ते चाळीस हजार होती. त्यामुळे लोकांना रोज पाणी मिळत होते.

कालांतराने शहराची लोकसंख्या वाढत गेल्यामुळे १९८७ साली पालखेड धरणातून सुमारे ९ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन सुरू झाली. पालखेड धरणातून रोटेशनद्वारे पाटोदा साठवणूक तलावात पाणी घेतले जाते. तेथून पंपिंग करुन सदर पाणी वागदर्डी धरणात आणल्यानंतर शहरात वितरीत केले जाते. वागदर्डी धरणाची अगोदर ९० दशलक्ष घनफूट क्षमता होती. त्यानंतर सांडव्याची भिंत वाढविण्यात आल्यामुळे धरणाची क्षमता ११० दशलक्ष घनफूट झाली. असे असले तरी धरण बांधल्यापासून त्याच्यातून गाळ काढण्यात आला नाही. तर धरणाऱ्या पाणलोट क्षेत्राच्या स्त्रोताच्या ठिकाणीच अनेक गावात पाझर तलाव बांधण्यात आल्यामुळे हे धरण लवकर भरतच नाही. त्यामुळे ७४ किमी अंतरावर असलेल्या पालखेड डाव्या कालव्यातून मनमाडच्या धरणाला पाणी रोटेशनद्वारे मिळते या पाण्यावरच शहराला पूर्णपणे अवलंबून रहावे लागते. पण, आता या योजनेमुळे थेट पाणी मिळणार आहे.

रेल्वेचे जंक्शन, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय अन्न महामंडळाचे धान्य साठवण ठेवणारे डेपो, ऐतिहासिक रेल्वे वर्कशॉप, विविध ऑईल कंपन्यांचे प्रकल्प, आणि शीख धर्मियांच्या सुप्रसिद्ध गुरुद्वारेमुळे मनमाड शहराची देशाच्या नकाशावर आगळीवेगळी ओळख आहे. इतक्या वेगवेगळ्या अर्थांनी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण सध्या पाणीटंचाईचे माहेरघर म्हणूनही या शहराला ओळखले जाते. पण, पाण्यामुळे शहराचा विकास खुंटला होता. पण, आता या योजनेमुळे विकासाला चालणा मिळणार आहे. त्यामुळे या महत्वपूर्ण योजनेचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

बघा या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

Cm Eknath Shinde Manmad MLA Suhas Kande Water project

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चार कर्मचाऱ्यांना चिरडल्याने रेल्वे कर्मचारी आक्रमक; रुळावर उतरुन आंदोलन, मुंबईकडे जाणारी रेल्वे रोखली

Next Post

श्री गजानन महाराज प्रकटदिन विशेष : महाराजांची नाशिक, त्र्यंबक आणि कावनई भेट… असा आहे इतिहास

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Chandrashekhar Bawankule
महत्त्वाच्या बातम्या

आता ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती

सप्टेंबर 3, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

या मार्गावर सुरू होणार रेल्वे…असा असेल रेल्वे मार्ग

सप्टेंबर 3, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये सव्वा चार लाख रूपयाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 3, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

सरकारने केवळ दोन समाजात वाद निर्माण करुन सत्तेची पोळी भाजली…रोहित पवार यांचा आरोप

सप्टेंबर 3, 2025
crime1
क्राईम डायरी

तब्बल सव्वा सतरा लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

सप्टेंबर 3, 2025
mantralya mudra
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 3, 2025
manoj jarange e1706288769516
महत्त्वाच्या बातम्या

किडे मकोडयांचं ऐकू नका, राईट काम होणार…मनोज जरांगे पाटील

सप्टेंबर 3, 2025
IMG 20250903 WA0169
राज्य

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे राज्यातील आरोग्य सेवा ठप्प

सप्टेंबर 3, 2025
Next Post
Gajanan Maharaj e1676263566358

श्री गजानन महाराज प्रकटदिन विशेष : महाराजांची नाशिक, त्र्यंबक आणि कावनई भेट... असा आहे इतिहास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011