गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही प्रतिक्रीया

by India Darpan
ऑगस्ट 3, 2022 | 12:23 pm
in संमिश्र वार्ता
0
cm eknath shinde 1 e1704958478974

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री व आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंतांच्या गाडीची काच फुटली असून याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे हल्ला करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई होणार का याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध नोंदवला आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

उदय सामंत पुणे दौऱ्यावर असतानाच आणि पुण्यातील तानाजी सावंत यांच्या घरी जात असतानाच उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. या प्रकरणानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत असून हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उदय सामंतांनी पोलिसांकडे केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी हल्लेखरांवर कठोर कारवाई करण्यात येण्यास असल्याचे सांगितले. मात्र या हल्ल्यामागे राजकीय व्यक्ती असतील तर त्यांच्यापर्यंत पोलिसांनी पोहचावे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही, मी पोलिसांशी बोलणार आहे. सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे. कोणी भडकावू भाषण करून चिथावणी देण्याचं काम करत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. उदय सामंत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिंदे यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना हा इशारा दिला.

शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत काल पुण्यात होते. तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज येथे सामंत यांची गाडी थांबली. त्यावेळी काही हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांची गाडी फोडली. पण सुदैवाने या हल्ल्यातून सावंत थोडक्यात बचावले. आम्हाला तानाजी सावंतांवर हल्ला करायचा होता. पण सामंतांवर हल्ला झाला. म आणि व मुळे घोळ झाल्याचा दावा या हल्लेखोरांनी केला. या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हल्ल्यामुळे सावंत आणि सामंत दोघेही संतापले आहेत. तानाजी सावंत यांनी तर या हल्ल्याची आठ दिवसात रिअॅक्शन मिळेल, असा इशाराच दिला आहे. तर सामंत यांच्यावरील हल्ल्याची सरकारने गंभीर दखल घेतली असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तानाजी सावंत यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. आम्ही शांत आहोत. याचा अर्थ असहाय्य नाही. आम्हीही दोन हात करू शकतो, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला आहे. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आम्ही विचार बदलला म्हणून तुम्ही आमचा खून करणार आहात का?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

पुण्यात काल शिवसेनेची कात्रज याठिकाणी सभा झाली. त्या सभेच्या नंतर परतत असताना काही व्यक्तींनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा काच फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा दिसून येत आहे. बऱ्याच वाहिन्यावर चित्रीकरण करण्यात आले आहे. या सगळ्या घटनेच्या मध्ये पूर्णपणे मी स्पष्ट करू इच्छिते की, हे जे लोक आहेत ते कोण आहेत. नक्की ते जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ते गृहीत धरणे की हे शिवसैनिकच आहेत किंवा कसं आणि तो हल्ला काही पूर्वनियोजित आहे की काय वगैरे अशा पद्धतीचे आरोप केले जातात ते योग्य नाही, असे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

आमच्या सभेत आदित्य ठाकरे यांनी जे भाषण केलं, आमची जी भाषणे झाली ते संपूर्णपणे लोकशाही चौकटीतलीच होती. उलट ज्यांना शिवसेनाची भूमिका पटत नाही त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे असे म्हटले होते. त्याचा कुठल्याही प्रकारच्या गाडी फोडण्याच्या घटनेचा आणि या भाषणांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांच्या तपासात जे काही समोरी येईल. त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Chief Minister Eknath Shinde on Uday Samant Car Attack

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

LIVE: महाराष्ट्रातील अभूतपूर्व सत्ता संघर्षः ज्येष्ठ विधीज्ञांच्या घमासान युक्तीवादानंतरही उद्या पुन्हा सुनावणी

Next Post

नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; वाहनधारक संतप्त

India Darpan

Next Post
cng

नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; वाहनधारक संतप्त

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011