गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चाणक्य नीतिः या गोष्टींमुळे माणसाला व्हावे लागते अपमानित

by India Darpan
मार्च 11, 2022 | 5:34 am
in राष्ट्रीय
0
chanakya

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महान अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी एका नीतीशास्त्राची रचना केली आहे. यामध्ये त्यांनी धन, संपत्ती, स्त्री, मित्र, करिअर आणि दांपत्य जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे सखोल विश्लेषण केले आहे. चाणक्य यांनी आपल्या धोरणांद्वारे समाजाला मार्गदर्शन केले आहे. जी व्यक्ती आचार्य चाणक्य यांच्या नीतींचे अनुकरण करते, ती आपल्या जीवनात प्रगती करते असे मानले जाते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्रात व्यक्तीचा अपमान करणाऱ्या काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. काही गोष्टी व्यक्तीला कधी ना कधी त्याच्या आयुष्यात अपमानित करत असतात, त्या कोणत्या आहे हे आपण जाणून घेऊया.
अज्ञान
आचार्य चाणक्य श्लोकाच्या माध्यमातून सांगतात, माणसाला आपल्या जीवनात अज्ञानामुळे अनेक वेळा अपमान सहन करावा लागतो. एखादा व्यक्ती अज्ञानी आणि मूर्ख असेल तर नागरिकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नसतो. त्यामुळे त्यांचा अपमान होतो. आपल्या मुर्खपणामुळे अनेक वेळा व्यक्ती असे काहीतरी करतात ज्याच्यामुळे त्याला अपमानित व्हावे लागते.

क्रोध
आचार्य चाणक्य सांगतात, तरुणपणी माणसामध्ये खूप जोश असतो. अशा अनेक परिस्थितींमध्ये माणूस आपला राग नियंत्रणात ठेवू शकत नाही. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागावर नियंत्रण नसल्यास माणूस नकळत अनुचित काम करतो. कधीकधी तो आपला मार्गही भटकू शकतो. त्यामुळे समाजात त्याला मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळू शकत नाही. त्यामुळे तरुणपणात माणसाला आपली ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च करावी, ज्यामुळे माणसाचे नुकसान होऊ शकणार नाही.
परावलंबी
चाणक्य सांगतात, की जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते, तिला आपल्या जीवनात प्रत्येकवेळी अपमानित व्हावे लागते. कारण ती व्यक्ती आपल्या जीवावर काहीच करू शकत नाही. तिला प्रत्येक कामात दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. तो स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. त्यामुळे तिला समाजात अनेक वेळा अपमान सहन करावा लागतो.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रेम चोप्राः नायक बनण्याचे स्वप्न घेऊन आले अन् बनले खलनायक; अशी आहे त्यांची जीवनकथा

Next Post

आरोग्य टीप्सः दाढीमध्ये खाज येत असेल तर या गोष्टींची काळजी घ्या…

India Darpan

Next Post
beard dadhi

आरोग्य टीप्सः दाढीमध्ये खाज येत असेल तर या गोष्टींची काळजी घ्या...

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011