मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात येत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं असताना, आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचेही शिवाजी महाराजांबाबतचे असे एक वेळेच आश्चर्यकारक आणि अज्ञानी विधान समोर आल्याने, नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
इतकेच नव्हे तर तसा वाद देखील सुरू झाला आहे, दि. ३ नोव्हेंबर रोजी मुंबईत कोकण महोत्सव पार पडला. या महोत्सवात बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. त्यानंतर या आमदार प्रसाद लाड यांच्या चुकीच्या व वक्तव्याचा म्हटल्याचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. यावरून आता भाजपावर जोरदार टीका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पत्रकारांना प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
खासदार राऊत म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद आज भाजपा उपटसुंभानी उकरून काढला. हे सर्व ठरवून चाललेय का? औरंगजेब किंवा अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे सत्ताधारी शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत. शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभाना मान्य आहे काय? असा सवालही संजय राऊतांनी भाजपाला केला आहे. तसेच इतका करारा जबाब मिलेगा! असे म्हणत इशाराही त्यांनी दिलाही आहे. त्यानंतर यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसाद लाड यांना लक्ष्य करत भाजपावर टीका केली. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असा सल्ला राष्ट्रवादीने दिला. तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आता माफी मागून चालणार नाही. तर भाजपाने आता रगडून प्रायश्चित्त केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 4, 2022
तर दुसरीकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील लाड यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. लाड यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहे. त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. लाड यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. ते जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्रातून काढून टाकले पाहिजे, असेही संभाजीराजे म्हणाले.
दरम्यान, या वक्तव्याबरोबर प्रसाद लाड यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे अनावधाने माझ्याकडून बोलले गेले. मात्र, माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादव यांनी माझी चूक सुधारत शिवनेरीवर जन्म झाला सुधारत सांगितले. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे लाड यांनी स्पष्ट केले. परंतु तरी हा वाद येथेच मिटेल असे वाटत नाही. त्यामुळे यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणी काहीही बोलण्यापूर्वी विचार करावा, असे आदेशच काढण्याची सरकारवर वेळ येते की, काय असे म्हटले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला – प्रसाद लाड ( आमदार -भाजप )
भाजपा नेत्यांनी महाराजांचा इतिहास बदलण्याचे षडयंत्र सुरूच ठेवले आहे..#महाराष्ट्रद्रोहीभाजप pic.twitter.com/fPrJoSSlfp
— Maharashtra Youth Congress (@IYCMaha) December 4, 2022
BJP MLA Prasad Lad Controversial Statement on Shivaji Maharaj