मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘भारत जोडो’ यात्रेत होतेय नाशिकच्या युवतीची चर्चा; पण का?

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 11, 2022 | 9:57 pm
in राष्ट्रीय
0
Capture 10

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘नफरत छोडो भारत जोडो’ असा नारा देत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सुमारे दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारी मधून प्रारंभ झाला असून या पदयात्रेमध्ये शेकडो तरूण -तरूणी सहभागी झाले आहेत. सध्या भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रात दाखल झाली असून यात्रेला जनतेचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्याच वेळी राहुल गांधी यांच्या पदयात्रेमध्ये नाशिकरोड येथील एका तरुणीने सुद्धा सहभाग घेतला असून सध्या तिची सर्वत्र चर्चा होत आहे याला कारण म्हणजे आतिषा पैठणकर नावाच्या या तरुणीने भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी एअर इंडीयाच्या नोकरीवर पाणी सोडले आहे. खरे म्हणजे आतिषाला तब्बल ३ वर्षांच्या सततच्या प्रयत्नानंतर एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली होती. तिला दि.७ सप्टेंबरला आतिषाला नोकरीवर रुजू व्हायचे होते. पण त्याच दिवशी भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली.

एकीकडे नोकरी आणि दुरीकडे भारत जोडो यात्रा अशी परिस्थिती असल्याने आतिषा द्विधा मन:स्थितीत अडकली होती. पण शेवटी आतिषाने नोकरीवर पाणी सोडत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नांदेड जिल्ह्याच्या देगलुरमध्ये भारत जोडोचे आगमन झाले होते, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यात्रा नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जात आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील आतिषा पैठणकर हिचे आपल्याच राज्यात सर्वत्र स्वागत होत आहे. आतिषा ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. आतिषाच्या घरी आई-वडील, बहीण आणि तिचा भाऊ असतो, तिचा भाऊ सध्या शिक्षण घेत असून तर मोठी बहीण ‘वर्क फ्रॉम होम ‘ करते. आतिषाने इलेक्ट्रिकमध्ये इंजिनिअरिंग केले असून एअर इंडियाच्या या नोकरीसाठी तब्बल तीन वर्षे प्रयत्न केले. एअर इंडियामध्ये तिची मुलाखत झाल्यानंतर तिला नोकरीवर रुजू होण्याचे पत्र पाठविले. तर इकडे आतिषाने भारत जोडो यात्रेत भारतयात्री म्हणूनही मुलाखत दिली होती.

दि. ६ सप्टेंबरला आतिषाही कोलकाता येथे जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहचली. पण नोकरी की भारत जोडो यात्रा या दोघांपैकी एकाची निवड करणे भाग होते. अखेर तिने नोकरीवर पाणी सोडत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. परंतु आतिषाच्या आई-वडिलांना हे कळाल्यानंतर ते आपल्या मुलीला रागावले. पण तिने एका महिन्यात परत येऊन पुन्हा नोकरी करेन, असा शब्द आई – वडिलांना दिला. त्यानंतर आतिषाने थेट कन्याकुमारी गाठत भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. भारत जोडो यात्रेला तरुणांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

आतिषा म्हणाली की, नव्या भारतासाठी भारत जोडो यात्रा महत्वकांक्षी आहे. या यात्रेच्या माध्यमातून देशभरातील तरुणाईशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तसेच त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी समजल्या. अनुभवाची ही शिदोरी पुढील आयुष्यात मोलाची ठरणार आहे, असे तिने सांगितले. समाजाला जागृत करणे महत्वाचे आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेत सहभाग होऊन राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असल्याचे अतिषाने सांगितले. आतापर्यंत हजारो किलोमीटर अंतर तिने कापले असून तिच्या पायाला फोड देखील आल्याचे तिने सांगितले. कन्याकुमारीपासून ते आतापर्यंत अतिशा हि भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत असून सध्या सोशल मीडियावर राहुल गांधीसोबतचा तिचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

Bharat Jodo Yatra Nashik Young Girl Attraction
Aatisha Paithankar Air India

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये ‘वाल्मीकि रामायण – वर्तमान युगाच्या संदर्भात’ या विषयावर १४ ते १८ नोव्हेंबरपर्यंत व्याख्यानमाला

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – …तर आनंदाचा लाभ मिळेल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

accident 11
क्राईम डायरी

भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू

सप्टेंबर 16, 2025
fir111
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास…तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

सप्टेंबर 16, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे आठ महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

धर्मांतरविरोधी कायद्यांना स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी…सर्वोच्च न्यायालायने दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
cbi
भविष्य दर्पण

सीबीआयने या माजी मंत्र्यांच्या बहिणी, मेहुण्या, पीएच्या जागेवर १६ ठिकाणी टाकले छापे…मिळाले हे घबाड

सप्टेंबर 16, 2025
income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

रेल्वेच्या ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक करण्याच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार बदल

सप्टेंबर 16, 2025
Next Post
Vichar Pushpa e1661943624606

इंडिया दर्पण - विचार पुष्प - ...तर आनंदाचा लाभ मिळेल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011