मुंबई – संजय लीला भंसाली दिग्दर्शित ‘बैजू बावरा’ या चित्रपटात रणबीर कपूर व दीपिका पदुकोन यात मुख्य भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या येत असतांना, आता रणवीर सिंघ आणि आलिया भट्ट यांची नावे पुढे आली आहेत. २०१९ मध्ये या चित्रपटाची घोषणा झाली होती. पण, अद्याप पर्यंत कलाकारांचे नाव निश्चित झालेले नव्हते. त्यामुळे अशा बातम्या सतत येत आहे.
‘बैजू बावरा’हा चित्रपट हुसैन झैदी यांच्या ‘ माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या कादंबरी वर आधारित आहे. निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केलेली नाही. तथापि, भंसाली म्हणाले की त्यांनी चित्रपटाची रचना मोठ्या पडद्यासाठी केली आहे. त्यामुळे ते चित्रपटगृहे उघडण्याची वाट पाहतील.
या चित्रपटाची तयारी कशी असेल याबाबतही काही माहिती पुढे आली आहे. टीम बैजू बावराचा सेट एका मोठ्या स्टुडिओमध्ये साकारला जाणार असून एकाच वेळी चित्रपट पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. या चित्रपटाचे शुटींग ७-८ महिने चालेल. रणवीर आणि आलिया या चित्रपटाचा भाग असल्याचे जवळपास निश्चित आहे. पण, भंसाली अजून एक लीड अभिनेत्रीच्या शोधात असल्याचे बोलले जात आहे. रॉकी और राणी की प्रेम कहाणीच्या शुटींग नंतर रणवीर-आलीया ‘बैजू बावरा’ चे काम सुरु करणार असल्याचे बोलले जात आहे. जर सर्व काही ठीक झाले तर ते २०२२ च्या मध्यपासून त्यावर काम सुरु करतील.