बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आशिया कपसाठी ही असणार टीम इंडिया; यांना मिळाला डच्चू

by Gautam Sancheti
ऑगस्ट 9, 2022 | 4:59 pm
in राष्ट्रीय
0
indian cricket team e1657792652278

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिकेटच्या विविध स्पर्धांकडे खेळाडूंची नावे तर प्रेक्षकांचे देखील लक्ष असते. आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप होय, यंदाच्या आशिया कप 2022 साठीचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर केला आहे. यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकणार आहे. विराटलाही संघात संधी मिळाली आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान. राखीव – दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल.

भारतीय संघाचा विचार करता यामध्ये काही दिग्गज खेळाडूंना डावलण्यात आलं आहे. ज्यामध्ये सलामीवीर शिखऱ धवन, गोलंदाज मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. शिखर मागील काही काळापासून फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्येहील त्याने चांगली कामगिरी केली. पण तरीही त्याला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळालं नाही. याशिवाय मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाजही संघात नसल्याचं दिसून आलं आहे. बुमराह दुखापतीमुळे बाहेर असल्याने अनुभवी गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमारच संघात आहे. तसंच ईशान किशन, संजू सॅमसन या युवांनाही संधी मिळालेली नाही. दीपक हुडाला मात्र संघात स्थान मिळालं आहे.

यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यावेळी भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना पार पडणार आहे.
सदर टुर्नामेंट ही 28 ऑगस्टपासून होणार असून टीम इंडियाचा सध्याचा सर्वात चांगला बॉलर जसप्रीत बुमराह आशिया कपमध्ये सहभागी नसेल. पाठीच्या दुखापतीमुळे तो या टुर्नामेंटमध्ये खेळू शकणार नाही अशी माहिती आहे. त्याची सध्याची दुखापत पाहता त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी त्याला आधी विश्रांती देण्यात आली असण्याची शक्यता आहे.

हर्ष पटेलही दुखापतीमुळे एशिया कपसाठी टीममध्ये समाविष्ट नसेल असे बीसीसीआयने सांगितले आहे. तर श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर या तीन प्लेअर्सची नावे स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आलेली आहेत, अशी माहिती बीसीसीआयने ट्विट करुन दिलेली आहे. टीम इंडियाने आत्तापर्यंत या टुर्नामेंटमध्ये 13 पैकी सात वेळा चॅम्पियन राहिलेली आहे. यासह तीन वेळा ती फायनला जाऊन जिंकू शकलेली नाही. यात दुसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे. श्रीलंका पाचवेळा चॅम्पियन राहिलेली आहे आणि सहा वेळा रनर अप राहिलेली आहे.

टी-20 वर्ल्डकपमध्ये पहिल्याच मॅचमध्ये झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी या एशषिया कपमध्ये टीम इंडियाला मिळणार आहे. 28 ऑगस्टला टीम इंडियाचा पहिला मुकाबला पाकिस्तानशी असणार आहे. यावेळी एशिया कपचे यजमानपद श्रीलंकन क्रिकेट बोर्ड करते आहे. श्रीलंकेत असलेल्या आर्थिक संकटांमुळे पहिल्यांदा एशिया कपच्या मॅचेस या दुबईत होतील अशी चर्चा होती. 21ऑगस्टपासून क्वालिफायर मॅचेस सुरु होणार आहेत. यात दुबई, ओमान, नेपाळ, हाँगकाँगसहित इतर टीम असणार आहेत.

Asia Cup Indian Cricket Team Players

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंत्रिमंडळ विस्तारः ‘येत्या आठ-दहा हे दिवसात हे समोर येणार’, जयंत पाटील यांचा टोला

Next Post

मुंबईसह या १ हजार शहरांमध्ये जिओ देणार 5G सेवा; चाचणी यशस्वी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
jio 5g

मुंबईसह या १ हजार शहरांमध्ये जिओ देणार 5G सेवा; चाचणी यशस्वी

ताज्या बातम्या

कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार 1 1920x1280 1

नाशिक येथील ‘आयटीआय’सह राज्यातील या पाच औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार….विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

जुलै 9, 2025
Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011