मंगळवार, डिसेंबर 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तुम्हाला माहित आहे का? अवघ्या १५ मिनिटात आनंद बक्षी यांनी लिहिले होते हे हिट गीत!

जून 22, 2021 | 12:26 am
in मनोरंजन
0
E3SefDQVcAgisYK

विशेष प्रतिनिधी, मुंबई
प्रत्येक गाण्याची एक कहाणी असते, किंबहुना एक गंमत असते. ते गाणे तयार करण्यापासून ते गाणे चित्रपटात असो की एखाद्या स्टेजवर सादर होईपर्यंत त्याचा एक अनोखी प्रवास असतो. त्यातही काही गाणी ही अत्यंत सुपरहिट होतात किंबहुना लोकप्रिय होतात, त्यामागे काही किस्से असतात. असाच एक छान किस्सा ‘मिस्टर नटवरलाल ‘ या चित्रपटातील ‘परदेशीया ये सच है पिया …’ या गाण्याचा किस्सा आहे.
त्याकाळी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे फक्त काही तारखा शिल्लक राहिल्या होत्या. चित्रपटाचे प्रसिद्ध निर्माता टिटो यांनी दिग्दर्शक राकेश कुमार यांच्याशी बोलून ‘राम बलराम’ चित्रपटाच्या शूटिंग मधून उरलेल्या तीन महिन्यांत नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणाचा निर्णय घेतला. आणि असा तातडीने बनलेल्या चित्रपटाचे नाव होते, ‘मिस्टर नटवरलाल’. विशेष म्हणजे ८ जून १९७९ रोजी अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला.

DfGhlPeUcAAU5Dl

‘मिस्टर नटवरलाल’ चित्रपटाचे सर्व युनिट काश्मीरमध्ये पोचेपर्यंत कोणालाही कळले नाही की, ते सर्व तिथे काय करणार आहेत.  प्रत्येकाची तिकिटे बुक केली होती.  कोणत्या रेल्वेने कुठल्या दिवशी जाणार हे ठरवले?  पण हा चित्रपट कोणता आहे हे ठरलेले नव्हते. दिग्दर्शकाने आतापर्यंत फक्त चित्रपटाच्या केवळ मोठ्या दृश्यांचा विचार केला होता.  चित्रपट निर्मितीच्या भाषेत त्याला ‘गिमिक्स ‘ म्हणतात. पण कथा आणि चित्रपट गीते मात्र ठरलेले नव्हते, त्यामुळे प्रसिद्ध गितकार आनंद बक्षी यांच्यावर प्रथम गीतांची जबाबदारी आली.
      संचालक राकेश कुमार यांनी गाण्यांसाठी गीतकार आनंद बक्षी यांच्या घराच्या फेऱ्या मारण्यास सुरवात केली.  बक्षी साहेब यांना जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटासाठी केवळ दोन ते तीन आठवड्यांत गाणी लिहिणे अपेक्षित आहे, हे समजले तेव्हा त्यांनी निर्माता दिग्दर्शकाला दोघांनाही त्यांच्या घरातून जाण्यास सांगितले. अखेर संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांनी तोडगा काढून हे प्रकरण मिटवले आणि बक्षी साहेब यांना विनंती केले. त्यानंतर बक्षी साहेब एक-एक गाणे देतच राहतील आणि निर्माते त्यांना या क्रमवारीत रेकॉर्ड करत राहिल, असा निर्णय घेण्यात आला.
     बक्षी साहेब यांनी त्यावेळी असेही म्हटले आहे की, जर आपण काम लवकर केले तर बाकीचे निर्माते रागावले. ते म्हणतील की, बक्षी साबने त्या लोकांना सर्व काही दिलं आहे. म्हणजेच ‘सब कुछ ( दिल ) उन्हेही दे दिया.. ‘ रागाच्या भरात बाहेर पडलेली ही गोष्ट चित्रपटाची सर्वाधिक हिट गाण्याचे बोल ठरली.  आणि गीताचे बोल होते, ‘परदेशीया ये सच है पिया, सब कहते है मै मुझे, तुझको दिल दे दिया’… अवघ्या १५ मिनिटांत हे गाणे आपल्या नादात तयार झाले. आणि आनंद बक्षी साहेबांनी हे गाणे निर्मात्यांच्या हाती सोपविले आणि ते सुपरहिट ठरले.
    विशेष म्हणजे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेल्या ‘मिस्टर नटवरलाल’ या गाण्याच्या शुटिंगच्या वेळी अमिताभ आणि रेखा यांच्यातील मैत्रीचे किस्से संपूर्ण देशाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचले होते. यापूर्वीही दोघांनी एकत्र काम केले होते आणि त्यानंतर दोघांची जोडी ‘राम बलराम’ मध्येही दिसली होती. परंतु काश्मिरातील गीताच्या आणि कथाच्या चित्रिकरणामुळे चांगलीच चर्चा रंगली. लता मंगेशकर यांच्यासह किशोर कुमार आणि अमिताभ बच्चन, आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनीही मिस्टर नटरलाल या चित्रपटात गाणी गायली आहेत. अनुराधा पौडवाल यांनी मोहम्मद रफीसमवेत या चित्रपटाचे एक गाणेही गायले आहे.  चित्रपटाच्या गाण्यातील संगीताने चित्रपटाला हिट बनविण्यात खूप मदत झाली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – वायफाय

Next Post

कोरोनामुळे गरिब देशांवर येणार ही वेळ; संयुक्त राष्ट्राला सतावतेय ही चिंता!

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
DjWVHZpWwAAQNwV

कोरोनामुळे गरिब देशांवर येणार ही वेळ; संयुक्त राष्ट्राला सतावतेय ही चिंता!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011