इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगरपालिका प्रशासनाने रविवारी द्वारका सर्कल वरील सर्व अतिक्रमण काढले. रस्त्याला अडथळा असणारी ही अतिक्रमण काढून मार्ग मोकळा करण्याची अनेक दिवसांची मागणी होती. पण, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होते. व्दारका सर्कलवर होणारी कोंडी सोडवण्यासाठी तीन दिवसापूर्वीच व्दारका सर्कल काढण्यात आले. त्यानतंर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मंत्री छगन भुजबळ, नाशिक मध्य विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे यांनी द्वारका सर्कल प्रश्नावर तीव्र आवाज उठवल्या आता प्रशासन जागे झाले. या कारवाईबाबत बोलतांना आ. फरांदे म्हणाल्या की, तात्पुरती मलम पट्टी न करता या समस्येवर कायमचा तोडगा काढावा. या ठिकाणील रस्त्याचे रुंदीकरण करून नागरिकांना चालण्यासाठी नाशिक म.न.पा.ने फूटपाथ तयार करावा आणि पोलिस प्रशासनाने येथील ट्रॅफिकचे नियोजन करावे.
त्याचबरोबर येथील अनधिकृत रिक्षाचे थांबे आणि टॅक्सी स्टँड स्थलांतरील करून कन्नमवार पुलाच्या येथे हलवण्यात यावा, टॅक्सी आणि रिक्षा यावर संपूर्ण नियंत्रण हे पोलिस प्रशासनाचे असायला हवे. या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठवपुरवा करत राहणार असल्याचे देखील आ. फरांदे यांनी यावेळी स्पष्ट केले.