शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावधान! आज आणि उद्या अवकाळीचे संकट; असा आहे हवामान विभागाचा अंदाज

by India Darpan
जानेवारी 27, 2023 | 10:51 am
in मुख्य बातमी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्य नागरिक सहन करू शकतात. व्हायरलच्या जाचातून दोन-तीन दिवसांत बाहेरही पडणे शक्य आहे. पण शेतकऱ्यांचं होणारं नुकसान कधीही भरून निघत नाही. सध्या दोन दिवस शेतकऱ्यांवर वातावरणाच्या बदलाचे अर्थात अवकाळी पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदल मोठ्या प्रमाणात अनुभवायला येत आहे. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतुंचा क्रम असला तरीही हिवाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात उन अशीही परिस्थिती आपण बघतोय. आत्ताच एक महिन्यापूर्वी जवळपास पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पाऊस आणि कडाक्याची थंडी असं चित्र होतं. त्यानंतर सरासरी थंडीचा सामना करावा लागला, त्यामुळे दिलासा होता. पण आता हवामान खात्याने दोन दिवस ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. या पावसात सर्वाधिक नुकसान गव्हाच्या व हरभऱ्याच्या पिकाचे होईल. तर ऊस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसू शकतो. या अचानक झालेल्या बदलामुळे शेतकरी धास्तावला आहे.

नियोजन आवश्यक
बरेचदा हवामान व कृषीतज्ज्ञांकडून वातावरणातील बदलांनुसार शेतीचे नियोजन करण्याचा सल्ला दिला जातो. पण अवकाळी पावसाची माहिती आधीपासून कळत नाही, अश्यात शेतकऱ्यांनी नियोजन कसे करावे, हा प्रश्न कायम राहातो.

आधी थंडी आता पाऊस
गेल्या आठ दिवसांमध्ये नाशिक, खान्देशसह राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीची नोंद झाली. विदर्भात दिवसभर उकाडा आणि रात्री व पहाटे कडाक्याची थंडी लोक अनुभवत होते. आता वातावरणात अचानक बदल होऊन पुढचे दोन दिवस ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Alert Rainfall Climate Weather Forecast IMD

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

नाशिककरांच्या मागणीस्तव शिवपुत्र संभाजी महानाट्याचा उद्या, शनिवारी विशेष शो

Next Post
Sambhaji Natya

नाशिककरांच्या मागणीस्तव शिवपुत्र संभाजी महानाट्याचा उद्या, शनिवारी विशेष शो

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011