मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘बिग बॉस’ या रेअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या आवडत्या सिलेब्रीटीबद्दल अधिक जाणून घेता येते. खासकरुन त्यांचे राहणीमान, बोलणे, विचार, घरातील वातावरण, त्यांची आजवरचा वाटचाल आदी. अशाच प्रकारे सध्याच्या ‘बिग बॉस १५’ मधील एका टास्कच्या माध्यमातून प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांबद्दल काही रहस्य माहिती पडले.
या टास्क मध्ये स्पर्धकाला एका चिट्टीवर आपल्या आयुष्यातलं एक रहस्य लिहायचे होते. त्यानंतर उर्वरित सदस्यांनी ते रहस्य कोणाच्या जीवनातले आहे, याचा अंदाज घ्यायचा आणि त्या स्पर्धकाला चॉकलेट द्यायचे होते. या टास्क मध्ये सेलिब्रिटी राखी सावंत हिने आपल्या आयुष्यातले रहस्य सांगितले. अभिनेता करण कुंद्रा याने ती चिठ्ठी उचलली. राखीने त्यात लिहिले होते की ‘माझ्या वडिलांचे दोन विवाह झाले आहेत, एक माझ्या आई सोबत आणि एक माझ्या सावत्र आई सोबत.’ त्यावेळी करणने अंदाज लावला की हे रहस्य राखीचं आहे. आणि त्याने तिला चॉकलेट दिले. त्यावेळी राखी भावूक होऊन रडायला लागली. तिने ऑन स्क्रीन तिच्या आईची माफी मागितली. या टास्क मध्ये रश्मी देसाईचे रहस्य उघडले की, तिने ३५० रुपयांपासून करिअरची सुरुवात केली. करण कुंद्रा विषयी असे समोर आले की, त्याचं इंस्टाग्रामवर एक बनावट खाते आहे. ज्यावरून तो त्याच्या सेलिब्रिटी क्रशचे फोटो पाहतो.