इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय चित्रपटसृष्टीला आणि त्यांच्या चाहत्यांसाठी देखील धक्कादायक होता. त्यामुळेच या घटस्फोटाची चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत झाली. १९९८ मध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकले. पण, तब्बल १८ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय का घेण्यात आला, यामागे कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आता शेवटी मलायकानेच या प्रकरणी मौन सोडत यामागचे कारण सांगितले आहे. दरम्यान, घटस्फोटानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय. तर अरबाज खान हा मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे.
मलायकाचा एक नवीन शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये तिने घटस्फोट घेण्यामागचं खरं कारण सांगितलं. ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा तिचा शो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. घटस्फोटापूर्वी मलायका आपलं लग्न कसं झालं हे सांगते. प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि मैत्रीण फराह खानसोबत आपल्या लव्हस्टोरीबद्दल सांगताना मलायका म्हणते, मी स्वतःच अरबाजला प्रपोज केलं होतं. पण, हे कोणालाच माहीत नाही. अरबाजने मला नाही तर मी त्याला लग्नासाठी विचारलं होतं. मला लग्न करायचं आहे, तू तयार आहेस का, असा प्रश्न मी त्याला विचारला. त्यावर त्याने केवळ तू तारीख आणि जागा ठरव”, असं मला सांगितल्याचं मलायका म्हणाली.
खरं तर मला काही करून घरातून बाहेर पडायचं होतं, म्हणून मी अरबाजशी लग्न केल्याचं तिने सांगितलं. पण काळानुसार माझ्या स्वभावात बराच बदल झाला. मला माझ्या आयुष्यात काही वेगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या. पण, त्या तशा झाल्या नाहीत. उलट आता घटस्फोट झाल्यानंतर आम्ही नीट बोलू लागलो आहोत असं मला वाटतंय. ‘दबंग’ चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आमचं ठीकठाक चाललं होतं. पण त्यानंतर आमची एकमेकांवर चिडचिड होऊ लागली. आमच्या नात्यातील अंतर दिवसेंदिवस वाढतच गेलं”, असं मलायकाने सांगितलं.
Actress Malaika Arora on Divorce with Arbaaz Khan