मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘कच्चा बदाम’ या हिट गाण्यावर डान्स करून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अंजली अरोरा सध्या एका एमएमएसमुळे चांगलीच चर्चेत आहे. वास्तविक ‘कच्चा बदाम’ नंतर ती कंगना रणौत सूत्रसंचालक असलेल्या ‘लॉक अप’ या कार्यक्रमामुळे तिला ओळख मिळाली. सध्या मात्र ती या दोन्हीही कारणांसाठी चर्चेत नाही. ती चर्चेत असण्याचं कारण वेगळंच आहे. अंजलीचा एक एमएमएस व्हायरल होत आहे. यात एक मुलगी संकटात सापडल्याचे दिसते आहे. प्रेक्षकांच्या मते यातील ही मुलगी अंजली अरोरा आहे. हा एमएमएस आल्यानंतर लोकांमध्ये याबद्दल चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे इतक्या दिवसांनी अंजलीने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अंजली अरोरा हिने नुकतीच सिद्धार्थ कानन याला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले आहे. सिद्धार्थने तिला विचारले की, अवघ्या एकविसाव्या वर्षी तुला एवढी प्रसिद्धी मिळाली आहे. यश मिळाले आहे. पण प्रसिद्धीच्या झोतात असताना जेंव्हा तुमच्याविरोधात एखादा एमएमएस येतो, तेंव्हा ती मुलगी हे सहन करू शकते का, याबद्दल तुला काय वाटते?
यावर अंजली म्हणते की, लोकांचे काय चालले आहे हे मलाच कळत नाही. माझे नाव देऊन, माझा फोटो लावून तो एमएमएस माझा असल्याचे सांगितले जात आहे. हे असे का केले जात आहे, हे मला माहीत नाही. खरे तर, आज मी जी कोण आहे, ती याच लोकांमुळे आहे. असे असतानाही माझ्या बाबतीत असे का होते आहे, हे अनाकलनीय आहे. जसं प्रत्येकाला आपले कुटुंब असते, तसे मलाही आहे. माझ्या घरातील व्यक्तीही हे एमएमएस पाहतात हे, सांगताना अंजली रडू लागते.
काही लोकांना असे करून काय मिळते, हेच कळत नसल्याचे अंजली म्हणते. ज्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही, त्याच्याशी माझा संबंध जोडून कोणाला काय मिळते? केवळ युट्यूबवर काहीशे लाईक्स मिळवण्यासाठी असे काहीतरी करणे, कितपत योग्य आहे, असा सवालही अंजली विचारते.
Actress Anjali Arora on Viral MMS
Bollywood Entertainment