सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयातील निफाड तालूक्यातील तारुलखेड हा परिसर बिबट्या प्रवणक्षेत्र म्हणून ओळखला जातो. याच परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचे अनेक वेळेस समोर आले आहे. यापूर्वी येथील जगताप व गवळी वस्तीवर काही अप्रिय घटना घडल्या होत्या. बिबट्यांचा मुक्त संचार पाहता तीन दिवसापूर्वी येथे पिंजरा लावण्यात आला होता. वनविभागाने लावलेल्या या पिजं-यात भर दिवसा दोन ते तीन वर्षाचा मादी जातीचा बिबट्या जेर बंद झाला आहे. आतापर्यंत या बिबट्या प्रवण क्षेत्रातून १० पेक्षा जास्त बिबटे जेरबंद करण्यात आले आहे. सध्या पकडण्यात आलेल्या बिबट्यामुळे तारुलखेडे ग्रामस्थानी सुटकेचा निश्वास सोडला आहे.