इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…हाच एक सुलभ व खराखुरा मार्ग आहे.
सर्व प्रकारच्या उतावीळ कर्माचा त्याग करणे, कोणत्याही तऱ्हेच्या वादंगात न पडणे, निरर्थक गप्पागोष्टी न करणे, कोणत्याही कर्माला साधे रूप देणे — त्याचा बडेजाव न करणे, त्यातील कष्टांचा बाऊ न करणे, कल्पनेच्या वारूवर बसून इकडे-तिकडे भटकण्यास मनास मनाई करणे, स्वतःच्या क्षेत्राच्या बाहेर बुद्धीला लुडबुड करू न देणे — या सर्व गोष्टींमुळे परमेश्वरी इच्छेचे अनुसरण सोपे होऊन जाते.
तुमच्या श्रद्धाविषयास चिकटून रहा व त्यास धरूनच सर्व व्यवहार करा. समजा, चुकून काही विपरीत वर्तन झाले, तरी निराश, उदास न होता आपल्या ठिकाणच्या शौकिनपणास व आढ्यतेस चांगलाच प्रतिकार करा.
सतत नम्र, शांत व समवृत्तीत राहण्याचा व घडणाऱ्या घटनांचा मनावर अती खोल संस्कार होऊ न देण्याचा अभ्यास ठेवा. आत्मोन्नतीचा हाच एक सुलभ व खराखुरा मार्ग आहे.