नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतात गेले कित्येक वर्षे सोन्याची खरेदी ही प्रामुख्याने रोखीमध्ये होते. सुधारणावादी उपाययोजांमुळे, रोख खरेदीवरील निर्बधांमुळे बहुतांश बचत सोने अथवा स्थावर मालमत्ता खरेदीऐवजी प्रामुख्याने भांडवली बाजाराकडे वळले आहेत. यापूर्वी भारतातील सोन्याची मागणी वार्षिक ८०० ते ९०० टन राहिली आहे. पुरूष असो की महिला सर्वांना सोने हे प्रिय असते. सोन्याचे दागिने घालून लग्न समारंभात अनेक जण दिसत. मात्र आपल्या घरात किती सोने असावे असा देखील अनेकांना प्रश्न पडतो.
सध्या देशभरात सध्या सक्तवसुली संचालनालय, म्हणजे ईडीच्या कारवाईची चर्चा रंगली आहे. प्रत्येक राज्यात ईडीच्या छापेमारीचीच धसका नेत्यांसह सर्वसामान्य व्यापाऱ्यांनी घेतला आहे. आयकर खात्यापेक्षा ही ईडीचा धाक वाढला आहे. केव्हा धाड पडेल सांगता येत नाही. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरावरील छापा आणि शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात कोलकात्यामध्ये अभिनेत्री आणि मॉडेल अर्पिता मुखर्जीच्या घरावर जी कारवाई झाली. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.
सर्वसामान्य नागरीक ही या कारवाईसंबंधी सजग होत आहे. अनेक जण गुगल सर्चमध्ये ईडीच्या कारवाईची आणि किती मालमत्ता असावी, रोख किती असावी, सोन्याचे दागिणे किती असावे याची माहिती घेत आहे. पूर्वी आपल्या देशात सुवर्ण नियंत्रण कायदा होता परंतु तो आता इतिहास जमा झाला आहे. घरात तुम्ही किती सोने ठेऊ शकता, याविषयी काही मर्यादा आहेत. घरात जास्त सोने असल्याची कुणकुण लागल्यावर खरंच प्राप्तिकर खात्याची धाड पडू शकते का? जर कायदा अस्तित्वात नाही तर मर्यादा किती आणि कारवाई काय होऊ शकते? असे अनेक प्रश्न उपस्थित होता. केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाने याविषयीचे परिपत्रक जाहीर केले आहे.
घरात रोख रक्कम ठेवण्याला मर्यादा नाही. पण ही रक्कम कुठून आली, त्याचे स्त्रोत काय याची माहिती चौकशी जर झाली तर तुम्हाला द्यावी लागेल. यासंबंधीचे सविस्तर उत्तर तुम्हाला तपास यंत्रणेला देता येणे आवश्यक आहे. तसेच याविषयीचे कागदोपत्री पुरावे सादर करणं बंधनकारक आहे. जर तुमच्या उत्पन्नापेक्षा अधिकची रक्कम तुमच्याकडे सापडली तर आवश्यकतेनुसार आणि तुमच्याकडील माहितीनुसार कारवाई करण्यात येते. एखाद्याला दंड ठोठावला जातो. रक्कम जप्त होते आणि न्यायालयीन खटल्यात जो निर्णय होईल, त्यानुसार शिक्षा होते.
तसेच काही प्रकरणात रोख जप्त होते. दंड आणि शिक्षा दोन्ही होतात. काही प्रकरणात 50 ते 150 टक्क्यांपर्यंत दंड होऊ शकतो. प्राप्तिकर खात्याने याविषयीचे काही नियम आणि काही मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यानुसार , वर्गीकरण करण्यात आले आहे. त्याप्रमाणे त्या व्यक्तीला दागिणे, आभूषणे बाळगता येतात. घरात ठेवता येतात. या नियमानुसार लग्न झालेले आणि लग्न न झालेल्या महिला आणि पुरुषांसाठी नियमात बदल आहे. एका विवाहित महिलेला 500 ग्रॅम सोन्याची आभुषणे, दागिने ठेवता येतील. तर अविवाहित महिलेला 250 ग्रॅम सोन्याची दागिने जवळ बाळगता येतील. परंतु पुरुष याबाबतीत तेवढे भाग्यवान नाहीत.
पुरुष विवाहित असो वा अविवाहीत, त्याला 100 ग्रॅमपेक्षा जास्तीचे सोने बाळगता येत नाही. जर प्राप्तीकर खात्याची धाड पडली तर याहून जास्त्तीचे सोने जप्त होईल. परंतू, 100 ग्रॅमपर्यंतचे सोने जप्त होणार नाहीत. ही मर्यादा कुटुंबासाठी आहे. यापेक्षा जास्त सोनं जर सापडलं तर प्राप्तिकर अधिकारी ते जप्त करु शकतात. दुसऱ्याचं सोनं तुम्ही तुमच्या घरात ठेवलं आणि त्याचं समाधानकारक उत्तर देता आले नाही अथवा मर्यादेपक्षा ते अधिक आढळल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे नियमावलीनुसार वागणे आवश्यक व योग्य ठरते.
Gold Home Limit Storage ED Income Tax Rule