‘जंकफुड’चे आरोग्यावरील घातक परिणााम
अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 हा कायदा 5 ऑगस्ट 2011 या दिवशी अंमलात येवून संपूर्ण भारतात या कायद्यांची अंमलबजावणी लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आझादी का अमृत महोत्सवातंर्गत अन्न व औषध प्रशासनामार्फत 5 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘अन्न सुरक्षा सप्ताह साजरा’ करण्यात येत आहे.
या सप्ताहानिमित्ताने अन्न व्यवसायिक तसेच सामान्य नागरिकांसाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर विविध शिबिर, कार्यशाळा, व्यसनमुक्ती शपथ, कमी तेल, मीठ, साखरेतील पाककृती स्पर्धा, तसेच बॅनर्सच्या माध्यमातून अन्न व्यवसायिकामध्ये जनजागृती पर कार्यक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमात शालेय विद्याथी, महिला, नागरिक, विविध सेवाभावी संस्था व व्यापारी संघटनाचा प्रामुख्याने सहभाग घेण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्ताने ‘सुरक्षित आहार देई आरोग्याला आधार ’ हा संदेश घरोघरी पोहचला जात असून आहारातील जंकफूडचे दुष्परिणाम बाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून जंकफुडचे दुष्परिणाम विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया…
अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत 2006 नियम व नियमन 2011 अन्वये जंकफुड हे जिवाला घातक असल्याने त्यांचे दुष्परिणाम शरीराला केव्हाही घातक ठरु शकते, जसे वडापाव, पिझ्झा,बर्गर,समोसा,भजी,फ्रेंच फ्राईज,रोल्स आणि रॅप्स या सा-या चमचमीत पदार्थांना जंकफुड म्हणतात हे फुड पदार्थाचे स्टॉल आपल्याला जागोजागी दिसतात. परंतु असे फास्ट फुडच्या अति सेवनाने मानवी आरोग्यावर भयंकर दुष्परिणाम दिसत आहे
जसे मधुमेह होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे फास्टफुड सारख्या अपायकारी खाद्यपदार्थांचा आहारात असलेला समावेश,जेव्हा तुम्ही आरोग्यदायी आहार घेतात तेव्हा शरीराला योग्य प्रमाणात ग्लुकोजचा पुरवठा होतो तेव्हा इन्सुलिनचे प्रमाण योग्यरित्या राखले जाते. मात्र तुम्ही जंकफुडचे सेवन करता तेव्हा तुमच्या चयापचनावर अतिरिक्त भार येऊन शरीरातील इन्सुलिनचे कार्य बिघडते. तसेच जंकफुड खाल्याने लठ्ठपणा वाढतो व इन्सुलिनचे प्रमाण कमी होऊन मधुमेह जडण्याची शक्यता वाढते.
जंकफुड खाल्याने यकृतावर विपरीत परिणाम होण्याची श्यक्यता असते,मद्यपानाचा जो गंभीर परिणाम यकृतावर होतो,तोच परिणाम नियमित जंकफुड खाल्याने कालांतराने यकृतावरही होत असतो एक अभ्यासाच्या निष्कर्षानुसार असे दिसुन येते की, जे लोक जंकफुड खातात व नियमित व्यायाम टाळतात त्यांच्या यकृतांतील प्लाझमामध्ये चार आठवडयात बदल दिसुन आले आहेत. त्यामुळे जंकफुड खाणे टाळावे.
जंकफुड खाल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. मोठया आतडयाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता वाढली आहे तसेच हदयरोगाचा धोका संभवतो जंकफुड खाल्याने बॅल्ड कोलेस्टॉलचे वाढण्याची शक्यता अधिक असते,त्यामुळे हदयरोग होण्याची भिती वाढते तसेच साखर अचानक कमी जास्त होत राहिल्याने रक्तवाहिन्यांवर देखील त्यांचे गंभीर परिणाम दिसुन येतात. लहान शाळकरी मुले, तरुण आणि स्त्रीया तसेच प्रौढांमध्ये देखील फास्टफुड व जंकफुडचे घातक परिणाम दिसुन येतात जंक फुड, कोल्ड्रीग हे पदार्थ सेवन केल्याने लठ्ठ गटातील मुलांचे प्रमाण वाढत आहे. जंकफुड खाणे जिवाला धोका असल्याने जंक फुड खाणे टाळावे.
मुलांना या जंकफुड खाण्यापासुन परावृत्त करणेसाठी त्यांना सकाळी व सायंकाळी त्यांच्या भुकेच्या वेळी ताजी फळे,सुकामेवा,बटर मिल्क,नारळ पाणी,लिबु पाणी,इ. असे पदार्थ उपलब्ध करुन दयावेत जेणेकरुन त्यांची भुकही भागेल व शरीराला आवश्यक पोषणतत्वे देखील मिळतील,मुलांच्या आहारात मैदा,मीठ,साखर तेल यांचे अनावश्यक सेवन होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
अन्न व औषध प्रशासनातर्फेही जंकफुड टाळणेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने शाळा,कॉलेज मधील मुख्याध्यापक व प्राचार्यांशी भेटुन त्यांच्या शैक्षणिक आवारात जंकफुडची विक्री होणार नाही याविषयी दक्षता घेणेबाबत जागरुकता केली जात आहे. तसेच प्रत्यक्षात मुलांच्या भेटी घेवुन भविष्यात जंकफुडचे सेवन करणार नाही,अशी प्रतिज्ञा त्यांचेकडुन घेण्यात येत असून व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.त्यामुळे जंकफुड खाणे जिवाला धोका असल्याने जंक फुड खाणे टाळावे.असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी केले आहे.