शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बापरे! जगभरात ९३ कोटी टन अन्न जाते वाया; भूकबळीचाही प्रश्न गंभीर

by Gautam Sancheti
मार्च 6, 2021 | 5:47 am
in संमिश्र वार्ता
0
EvamoY XAAslVLo

नवी दिल्ली – जगभरात अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून, गेल्या वर्षी जवळपास ९३.१० कोटी टन अन्न वाया जात असल्याची माहिती संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालातून समोर आली आहे. हा आकडा एकूण अन्नाच्या १७ टक्के आहे. भारतातल्या घरांमधून जवळपास ६.८७ कोटी टन अन्नाची नासाडी होत असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमनं (यूएनईपी) तयार केलेल्या अन्नाच्या नासाडीसंदर्भातल्या २०२१ च्या अहवालानुसार, घरं, किरकोळ दुरानं, रेस्टॉरंटसह अन्नपदार्थ बनवणार्या ठिकाणी दररोज अन्नाची नासाडी होते.
त्यामध्ये ९३.१० कोटी टन अन्नापैकी ६१ टक्के भाग घरांमधून, २६ टक्के हॉटेल, १३ टक्के किरकोळ दुकानातून वाया जातो. जगात दरवर्षी प्रतिव्यक्ती १२१ किलो अन्न वाया जात आहे. प्रति घरांनुसार ७४ टक्के अन्न वाया जाते.
यूएनईपीचे कार्यकारी संचालक इंगर अँडरसन यांच्या माहितीनुसार, वातावरणातील बदल आणि नैसर्गिक साधनांच्या नुकसानाबद्दलची जबाबदारी आपल्याला समजणार नाही. त्याचे परिणाम आपल्याला एक दिवस भोगावे लागतील.
जगभरातील प्रत्येक देश आणि देशातील नागरिकांना अन्नाची नासाडी होणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागेल. खाद्यपदार्थांची नासाडी करण्यात श्रीमंत देश सर्वात पुढे आहेत. संयुक्त राष्ट्र संघानं आगामी २०३० पर्यंत अन्नाची नासाडी कमी करण्याचा संकल्प केला आहे.
अमेरिका आणि चीनमध्ये सर्वाधिक नासाडी, भारतातील परिस्थिती बरी
अहवालानुसार, भारतातील घरांमध्ये प्रति व्यक्तीच्या तुलनेत दरवर्षी ५० किलो अन्न वाया जाते. दुसर्या शब्दांत सांगायचे झाल्यास, प्रत्येक वर्षी भारतीय घरांमध्ये ६८,७६०,१६३ टन अन्नाची नासाडी होते. अमेरिकेतील घरांमध्ये प्रति व्यक्तीच्या तुलनेत दरवर्षी ५९ किलो आणि चीनमध्ये ६४ किलो अन्न वाया जाते.
दक्षिण आशियाई देशांच्या यादीत भारत शेवटच्या पायरीवर आहे. या यादीत अफगाणिस्तान सर्वात वर आहे. तिथं ८२ किलो अन्न वाया जातं. त्यानंतर नेपाळमध्ये ७९ किलो, श्रीलंकामध्ये ७६ किलो, पाकिस्तानमध्ये ७४ किलो आणि बांगलादेशमध्ये  ६५ किलो अन्नाची नासाडी होते.
एकीकडे अन्न नासाडी, दुसरीकडे भूकबळी
२०१९ मध्ये ६९ कोटी लोकांचा भूकबळीमुळे मृत्यू झाला आहे. ३०० कोटी लोकांना चांगलं पौष्टिक अन्न मिळाले नाही. नव्या अहवालानुसार, कोविड महामारीदरम्यान उपाशी राहणार्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान! नाशिक शहरातील बाधितांचा आकडा अडीच हजारांवर

Next Post

मी पुन्हा येईन! राज ठाकरे नाशिकहून मुंबईकडे रवाना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
raj thakare

मी पुन्हा येईन! राज ठाकरे नाशिकहून मुंबईकडे रवाना

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail11

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑगस्ट 9, 2025
RUPALI

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले हे पत्र

ऑगस्ट 9, 2025
प्रातिनिधिक फोटो

रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट

ऑगस्ट 9, 2025
fir111

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 9, 2025
crime11

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा

ऑगस्ट 9, 2025
Sharad Pawar

विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन लोक भेटले, १६६ जिंकून देण्याची गँरंटी दिली…शरद पवार यांचा खळबळजनक दावा

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011