नवी दिल्ली – चीन भारतीय उपखंडाला चोरपावलांनी विळखा घालण्याण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे श्रीलंका आणि नेपाळ इथल्या घडामोडींवर भारताने बारकाइने लक्ष द्यायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ट्वीटर संदेशात केले आहे. पूर्व लडाख मधे भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर माजी परराष्ट्र सचीव विजय गोखले आणि माजी हवाईदल प्रमुख भुषण गोखले यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष चर्चेचे आयोजन केले होते. त्या दरम्यान त्यांनी ट्वीट केले. भारताची आर्थिक प्रगती रोखण्यासाठी चीन ज्या पद्धतीनं राजकीय आणि धोरणात्मक व्युहरचना आखत आहे, ते फार चिंताजनक आहे, असंही ते म्हणाले.