Last updated on August 10th, 2020 at 01:35 am
मुंबई – राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी (८ ऑगस्ट) ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारी दिवसभरात १२ हजार ८२२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४७ हजार ४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २६ लाख ४७ हजार ०२० नमुन्यांपैकी ५ लाख ०३ हजार ०८४ नमुने पॉझिटिव्ह (१९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८९ हजार ६१२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ६२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे.