India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मांजरपाड्याच्या पाण्याने येवला, चांदवडचा दुष्काळ हटणार

India Darpan by India Darpan
August 26, 2020
in संमिश्र वार्ता
0

येवला – गत वर्षी काम अपूर्ण असतानाही मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूर पर्यंत आले होते. यंदा हेच पाणी मोठ्या प्रमाणावर येवला तालुक्याला मिळणार असून या पाण्याने येवला आणि चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे.
पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे काम १९७२ ला सुरू झाले ४० ते ४५ वर्षांनंतर आमदार छगन भुजबळ यांच्या माध्यमातून २०१९ ला पूर्ण झाले. भुजबळ यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी प्रवाहित झाले. पहिल्याच प्रयत्नात पुणेगाव ते दरसवाडी ६३ किमी आणि दरसवाडी ते बाळापूर ४२ किमी अशी १०५ किमी कालवा चाचणी पूर्ण झाली. येवला तालुक्यातील शेतकर्‍यांच्या तिसर्‍या पिढीला पाणी पाहण्याचा योग आला. पाणी आले अन् सतत दुष्काळी असा शिक्का असलेल्या येवला तालुक्यातील शेतकर्‍यांनी दसर्‍यालाच दिवाळी साजरी केली. ठिकठिकाणी गुढ्या उभारून शेतकर्‍यांनी पाण्याचे स्वागत केले.
मांजरपाडा प्रकल्पाचे काम अपूर्ण असूनही बाळापूर पर्यंत पाणी आले होते. जून २०२० अखेर पर्यंत मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पाणी तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत जाईल असे नियोजित असताना मात्र दुर्दैवाने कोरोना संकटाने १५ मार्चला लॉकडाऊन सुरू झाला आणि मांजरपाडा प्रकल्पाचे सुरू झालेले काम बंद पडले.
मांजरपाडा, पुणेगाव, ओझरखेड, दरसवाडी या लाभ क्षेत्रात कमी पाऊस असल्याने पाणी येणार की नाही या चिंतेत लाभक्षेत्रातील शेतकरी होता. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून या सर्व लाभक्षेत्रात चांगला पाऊस सुरू झाल्याने धरणे ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. त्यामुळे कालवा पुन्हा वाहणार अशी आशा निर्माण झाली आहे. लॉकडाऊन शिथिल होताच पालकमंत्री भुजबळ यांचे आदेशाने पुणेगाव ते बाळापूर पर्यंत कालवा दुरुस्ती, विस्तारीकरण, अडथळा दगड काढणे आदी कामे सुरू करण्यात आली होती. पुणेगाव ते दरसवाडी हे ६३ किमी काम पूर्ण झाले असून दरसवाडी ते बाळापूर मधील काम अंतिम टप्प्यात आहे. विसापूर ते बाळापूर हे शेवटचे ७ कि.मी. काम सुरू आहे. कालवा दुरुस्ती, रुंदीकरण झाल्याने दरसवाडी येथून पाणी सुटल्यावर तीन दिवसात पाणी पोहचेल अशी सर्वाना अपेक्षा आहे पुन्हा पाणी कधी येते याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Previous Post

पिंपळनेरमध्ये २७ ऑगस्टपासून जनता कर्फ्यू

Next Post

बोपेगाव कोविड सेंटरमध्ये सुविधांची वानवा; खासदार डॉ. पवारांकडून पाहणी

Next Post

बोपेगाव कोविड सेंटरमध्ये सुविधांची वानवा; खासदार डॉ. पवारांकडून पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – हास्य षटकार – इंग्रजीचे महत्त्व

September 29, 2023

दिंडोरी तालुक्यात शाळेच्या आवारात झालेल्या गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम वादात, शिक्षणमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

September 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

मतदार यादीचे काम करतानाच शिक्षकाचा मृत्यू… जळगाव जिल्ह्यातील घटना…

September 29, 2023

कर्मयोगीनगरमध्ये अभूतपूर्व उत्साहात गणेश विसर्जन; तीन हजार आठशे मूर्ती, दोन ट्रॅक्टर निर्माल्य संकलन

September 29, 2023

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या बैठकीत झाले हे निर्णय

September 29, 2023

नाशिकमध्ये उद्यापासून राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेचे आयोजन, २८ राज्यांचा सहभाग

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group