बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीने काय साधले?

by Gautam Sancheti
सप्टेंबर 11, 2020 | 9:46 am
in इतर
0
FB IMG 1599813957602

जयशंकर आणि वांग यी या भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या काल मॉस्कोत झालेल्या बैठकीत नियंत्रणरेषेवरचा तणाव कमी करण्याबाबत पाच कलमी कार्यक्रमावर सहमती झाल्याच्या बातमीचे स्वागत करण्याची घाई करता येणार नाही. चीनविषयीचा अविश्वास आता मनात इतका खोलवर रुजला आहे की, या पाच कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी खरेच झाली तरी दीर्घकाळ त्याकडे सावधपणे बघावे लागेल.
दिवाकर देशपांडे
दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि संरक्षणशास्त्राचे तज्ज्ञ आहेत)
भारताने कैलास पर्वतश्रेणीची शिखरे काबिज करून चीनची घुसखोरी केवळ थांबवलीच नाही तर चीनच्या ताब्यातील प्रदेशात घुसण्याची तयारी दाखवल्यामुळे चीनपुढचे सर्व पर्याय संपले आहेत. या शिखरांवर घुसखोरी करणाऱ्या  चिनी सैनिकांवर गोळ्या झाडण्यात येतील असा इशारा भारताने दिल्यानंतर हे साहस करायचे की नाही असा पेच चिनी लष्करी अधिकाऱ्यांपुढे नक्कीच पडला असणार. कारण घुसखोरांवर भारतीय सैन्याने गोळीबार केला तर त्यातला एकही घुसखोर वाचण्याची शक्यता नाही. शिवाय परिस्थिती चिघळली तर भारतीय सैन्य आक्रमक पवित्रा घेऊन मोल्डोचा चिनी तळ व तेथील रणगाडे, चिलखती गाड्या व अन्य युद्धसामुग्रीही नष्ट करू शकते. एवढेच नाही तर स्पँगूर तलावापासून उत्तरेला काही किलोमीटरवरच भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषा मानली गेलेली जॉन्सन लाईन आहे, तेथपर्यंत भारतीय सैन्य धडक मारू शकते. तशा परिस्थितीत चिनी सैन्याची परिस्थिती अवघड होईल. याच ठिकाणाहून पुढे ९० किलोमीटरवर तिबेट-झिंगझियांग रस्ता आहे, हा रस्ताही धोक्यात येऊ शकतो.
ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या उणे तापमानाच्या थंडीत भारतीय सैन्याच्या आक्रमक हालचालींना तोंड देणे चिनी सैन्याला खूप अवघड जाईल, हे ओळखूनच कदाचित चीनने तणाव कमी करण्याची तयारी दाखवली असावी.
चीनने खरेच आपले सैन्य मागे घेतले तरी आता भारत नियंत्रणरेषवरून आपले सैन्य मागे घेण्याची शक्यता  कमी आहे. आता ही सीमा कायम सजग व जागरूक राहील. आतापर्यंत नियंत्रणरेषेंवर फक्त गस्त घालण्यापुरताच फौजफाटा होता. त्यातही हिवाळ्यात गस्त फारशी चालू नसायची, त्याचा फायदा घेत चिनी सैन्य इंचइंच पुढे सरकत होते. आता सध्याच्या नियंत्रणरेषेचे काटेकोर संरक्षण भारताला करावे लागेल. एका अर्थी ते बरेच आहे, कारण एकदा सैन्य नियंत्रणरेषेनजिक कायम राहणार म्हटले की, तेथील पायाभूत सुविधा आपोआपच वाढतील व त्याचा परिणाम सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होण्यात होईल.
शिवाय चिनी सैन्याला वाटेल तशी मनमानी करता येणार नाही. लडाख हे आता चीन सीमेजवळील केंद्रशासित राज्य झाले आहे, त्यामुळे या राज्याच्या सीमेची विशेष काळजी घ्यावी लागेल.
जयशंकर-वांग यी भेटीत नेमके काय ठरले, सैन्य माघारी कशी होणार आहे वगैरे तपशील कळलेला नाही. तो कळेल तेव्हा त्यासंबंधी काही मत व्यक्त करता येईल. पण एक गोष्ट नक्की आता भारत-पाक नियंत्रणरेषे प्रमाणे भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रणरेषा सतत जागती राहणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सत्ताधाऱ्यांनी नाशिककरांना अनाथ केले; मनसेचा गंभीर आरोप

Next Post

नाशिकला होणार मेगा लेदर फुटवेअर क्लस्टर, प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20200911 WA0016

नाशिकला होणार मेगा लेदर फुटवेअर क्लस्टर, प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार 1 1920x1280 1

नाशिक येथील ‘आयटीआय’सह राज्यातील या पाच औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार….विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

जुलै 9, 2025
Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011