मुंबई ः महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात, असे साकडे त्यांनी राज्यपालांना घातले. शिक्षणाशी संबंधित अन्य महत्त्वाच्या मागण्याही त्यांनी केल्या.